रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्याला पावसाने झोडपल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला आहे. सकाळ आणि दुपारच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. लांजा तालुक्यातील आरगाव, व्हेळ रिंगणे ,कुरंग वीलवडे आदी भागांमध्ये पावसाची हजेरी झाली. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. या वेळी फळ कमी असतानाच आता अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे आंब्यांचे मोठे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला आंब्याचा घास शेतकऱ्यांकडून हिरावला गेला आहे. आंब्याचा मोहोर यंदा कमी असल्याने फळांची संख्या कमी होती. आता सलग दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने झाडावरुन फळे जमिनीवर पडली आहेत. अवकाळी पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आंब्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

