AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीस यांनी थेट केला एकच सवाल म्हणाले....

ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीस यांनी थेट केला एकच सवाल म्हणाले….

| Updated on: Mar 03, 2024 | 4:46 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ईव्हीएमच्या केलेल्या टीकेवरून थेट पलवटवार करत थेट सवालच केला आहे. पुढे फडणवीस असेही म्हटले की, विरोधक निवडणुकीत जिंकले तर ईव्हीएम मशीन चांगले असतात, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर....

मुंबई, ३ मार्च २०२४ :  देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं काही करू शकलेलं नाही, असं वक्तव्य म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ईव्हीएमच्या केलेल्या टीकेवरून थेट पलवटवार करत थेट सवालच केला आहे. पुढे फडणवीस असेही म्हटले की, विरोधक निवडणुकीत जिंकले तर ईव्हीएम मशीन चांगले असतात, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असं त्यांचं धोरण आहे. आता त्यांना माहिती आहे की, येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जनतेचा कौल नसल्याने हे सरकार सत्तेत येणार नाही. पण जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असी टीका ठाकरेंनी भाजवर केली होती.

Published on: Mar 03, 2024 04:46 PM