AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Aug 22, 2026 | 1:19 PM
Share

विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला लक्ष्य करून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. छात्रों की गूंज कार्यक्रमाला राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे भाजपने घाबरून बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप खोटा असून, भाजपने खोटे व्हिडिओ बनवून जनतेची दिशाभूल केल्याचा वडेट्टीवारांचा दावा आहे.

विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे घाबरलेल्या भाजपने एका कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे ते म्हणाले. छात्रों की गूंज या कार्यक्रमावर आरोप करणाऱ्यांना वडेट्टीवारांनी खरंतर हा टोला लगावला आहे.

वडेट्टीवार यांनी भाजपच्या एका प्रवक्त्याने केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. या प्रवक्त्याने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रत्येकी तीस हजार रुपये दिले जात असल्याचा दावा केला होता. यावर वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनो, थोडी तरी शरम ठेवा,” अशा शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, शहरात कुणालाही विचारले तरी एक जणही असे बोलणार नाही. वडेट्टीवार यांनी हे आरोप खोटे असून, भाजपचे लोक खोटे व्हिडिओ बनवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

सोशल मीडियावर भाजपच्या प्रवक्त्याला जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. परदेशी निधी आणि १०० कोटींच्या खर्चाबद्दलचे दावे “बेअकलेचे दिवाळे निघाले” असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादाला घाबरून भाजपने ही नीच पातळी गाठल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Published on: Aug 22, 2026 01:19 PM

Follow Us