विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही- नाना पटोले
"सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“जनता संभ्रमात आली आहे. एकीकडे राज्यात पाऊस नाही, भाजपला सत्तेच्या लालसेपोटी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. फक्त खुर्ची कशी मिळेल यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. 1 जुलैला शपथविधी होणार, अशा घोषणाही ते करू लागले आहेत. नेमकं काय चाललंय ते कळतच नाही,” असं नाना पटोले म्हणाले. “काँग्रेसचं स्पष्ट आहे, दु:खात असो किंवा सुखात, आपण सोबत राहायचं. ज्याच्याशी मैत्री करायची, ती प्रामाणिक करायची. ज्याच्या भरोशावर मोठं व्हायचं आणि त्याचंच घर पोखरून टाकायचं ही काँग्रेसची भूमिका नाही. ही भाजपची भूमिका आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो

