AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी झाली, हे पाप कुणाचे? मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर?

Eknath Shinde : मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी झाली, हे पाप कुणाचे? मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 12, 2022 | 8:31 PM
Share

मुंबईबद्दल एवढे प्रेम आहे तर रोखठोकमध्ये मुंबईत मराठी माणूस किती उरला आहे याची आकडेवारी जाहीर करावी असे अव्हान केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणसाच्या नावाखाली केवळ मते मागण्याचे काम झाले आहे. मुंबईमधला मराठी माणूस का शहर सोडून इतरत्र जात आहे, याचे उत्तर द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबई :  (Samana) सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटावर टीका करण्यात आली होती. याला देखील (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. शिंदे गटावर टीका करण्याचे डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ थांबत नाही. तर रोखठोकमध्ये (Mumbai) मुंबई आपली असल्याचे सांगत मुंबई गिळायला शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असल्याच्या आरोपालाही शिंदेंनी उत्तर दिले आहे. हे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. मुंबईबद्दल एवढे प्रेम आहे तर रोखठोकमध्ये मुंबईत मराठी माणूस किती उरला आहे याची आकडेवारी जाहीर करावी असे अव्हान केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणसाच्या नावाखाली केवळ मते मागण्याचे काम झाले आहे. मुंबईमधला मराठी माणूस का शहर सोडून इतरत्र जात आहे, याचे उत्तर द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Published on: Sep 12, 2022 08:31 PM