AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक विम्यातून ही पीकं वगळ्यामुळे शेतकरी चिंतेत, आमदारांशी चर्चा केल्यानंतर सुध्दा…

महाराष्ट्रात सध्या पाऊस सुरु आहे. जुलै महिन्यात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. बहुतांश धरण ही भरण्याच्या उंबठ्यावर आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाल्यास महापूर येण्याची शक्यता आहे.

पीक विम्यातून ही पीकं वगळ्यामुळे शेतकरी चिंतेत, आमदारांशी चर्चा केल्यानंतर सुध्दा...
farmer cultivationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2023 | 9:11 AM
Share

नंदुरबार : राज्य सरकारकडून (Maharashtra government) शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा (1 rupee crop insurance) देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून एक रुपया घेऊन पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. पीक विम्यातून पपई आणि मिरची पिकाला यातून वगळ्यामुळे काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकऱ्यांनी (farmer news) आमदारांची भेट घेतली. परंतु सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळतं आहे. १ रुपयात पीक विमा मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण होतं. परंतु महत्त्वाची पीक वगळ्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात पपई आणि मिरची पीक अधिक घेतलं जातं. पपई आणि मिरची या पिकांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मिळत असलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेच्या लाभापासून नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावं लागणार हे निश्चित झालं आहे.

भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी सरकारकडे पपई आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकरी संकटात सापडला आहे. आगोदर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं होतं. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालाय, तरी मुसळधार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभे राहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा देऊन मदत करावी. परंतु जिल्ह्यातील प्रमुख पीक पपई आणि मिरची पीकाला वगळल्याने शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांनी सरकारकडे केलेली मागणी मान्य करावी.

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील लोकांना अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. पंरतु ऑगस्ट महिना सुरु झाल्यानंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील काही भागात कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी प्रमाणात असेल अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील अधिक धरण ही जुलै महिन्यातील पावसाने भरली आहे. काही धरण भरण्याच्या उंबठ्यावर आहेत. त्यामुळं पुढच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यास धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणार आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पीकाचं नुकसान होण्याची शक्यता असते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.