AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील 912 गावांना अवकाळी पावसाचा फटका, 26 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान

वाशिम (washim) जिल्ह्यातील ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

विदर्भातील 912 गावांना अवकाळी पावसाचा फटका, 26 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान
unseasonal rain Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 26, 2023 | 3:54 PM
Share

अमरावती : एक आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासह (unseasonal rain) गारपिटीचा पश्चिम विदर्भातील 912 गावांना फटका बसला आहे. या आपत्तीमुळे अमरावती (amravati rain update), यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील 26 हजार दोनशे शेतकऱ्यांच्या 20, 376 हेक्टर शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. 16,737 क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित प्रक्रियेत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६५३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात ४,३१५ शेतकऱ्यांच्या ३,४०८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अकोला जिल्ह्यात ३,४७६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात २,२५२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय वाशिम (washim) जिल्ह्यातील ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

शेतकर्‍यांना ९३१ कोटींचे पीक कर्ज वाटप

वर्धा जिल्ह्यात ६९ हजार शेतकर्‍यांना ९३१ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे. आतापर्यंत झालेल्या कर्जवाटपाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक कर्जाचे वाटप झाले. १५ मार्चपर्यंत ६९ हजार शेतकर्‍यांना ९३१ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झालेय. बहुतांश बँकांकडून चांगले वाटप केले आहे. बँक ऑफ इंडिया कर्ज वाटपात आघाडीवर असून बँकेने उद्दिष्टाच्या १५१ टक्के वाटप केले..

रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला

नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटेमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील जवळपास ११ हजार शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला समोर जावे लागले आहे. जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून ज्या भागात पंचनामे झाले आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पीके आवरण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.