AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे

दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत असते. पण यंदाचे चित्र हे पावसामुळे बदलले आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी सुरु होणारा रब्बी हंगामाला यंदा नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.

यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 5:39 PM
Share

लातूर : पावसाचा परिणाम केवळ (Kharif Hangam) खरीप हंगामातील पीकावरच झालेला नाही तर आगामी रब्बी हंगामही या पावसामुळे लांबणीवर गेलेला आहे. अद्यापही खरीपातील पीकांची काढणी कामेच सुरु आहेत. दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत असते. (Rabbi Hangam) पण यंदाचे चित्र हे पावसामुळे बदलले आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी सुरु होणारा रब्बी हंगामाला यंदा नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.

मात्र, शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. रब्बी हंगामातील पीकांसाठी मोठ्या प्रमाणात मशागत करण्याची आवश्यकता नसून केवळ तणनाशकाची फवारणी करुनही रब्बीची पेरणी करता येत असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामच महत्वाचा असतो. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपातील सर्वच पीकाचे नुकसान झालेले आहे. सोयाबीन अजूनही पाण्यातच आहे. त्यामुळे यंदाची रब्बीतील पेरणी ही उशीराने होणार आहे.

खऱीप हंगामाच्या सुरवातीलाच शेती मशागत करण्यात आलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीवर अधिकचा वेळ खर्ची न करता थेट तणनाशकाची फवारणी करुन रब्बीच्या पेरणीला सुरवात करणे आवश्यक आहे. शिवाय पेरणीस उशीर होत असल्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार नसल्याने उत्पादन वाढीच्या अनुशंगाने पेरणी करणे आवश्यक आहे.

गहू- हरभरा हीच मुख्य पीके

खरीपात सोयाबीन आणि रब्बीत गहू आणि हरभरा हीच मुख्य पीके आहेत. हरभऱ्याचे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणे वाटपही करण्यात आलेले आहे. शिवाय यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बागायती क्षेत्रावर पाण्याची कमतरता भासणार नाही. केवळ पेरणी आणि पीकाची निवड हेच महत्वाचे राहणार आहे. मराठवाड्यात हरभरा य़ाच पीकावर शेतकऱ्यांचा भर असतो.

म्हणून हलकी मशागत गरजेची

रब्बी हंगामातील पेरणी ही शेतीची मशागत न करताच केली जाते. पूर्वी शेतामध्ये अधिकचे तण असल्याने ही मशागत केली जात होती. पण आता तणनाशक फवारणीचे पेव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीमध्ये वेळ खर्ची न करता थेट तणनाशकाची फवारणी करुन चाढ्यावर मूठ धरत आहे. याचा उत्पादनावरही काही परिणाम होत नाही,

जिरायत क्षेत्रावर योग्य वेळी पेरणी गरजेची

रब्बासाठी जिरायत आणि बागायत असे क्षेत्र आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने बागायत क्षेत्रावरील ओल ही कायम राहणार आहे. शेत जमिनीत ओल असल्याशिवाय रब्बीची पेरणी करु नये. अन्यथा पीक वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे बागायत क्षेत्रावर तर ओल राहणारच आहे पण जिरायत क्षेत्रावरील ओल ही लवकर गायब होते त्यामुळे या शेतजमिनीवर योग्य वेळी पेरणी होणे गरजेचे आहे.

यंदा रब्बीचा पेरणी उशीराने

दरवर्षी रब्बीची पेरणी ही 15 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होत असते. यंदा मात्र, अतिवृष्टीचा परिणाम थेट रब्बीच्या पेरणीवरही झाला आहे. अजूनही मराठवाड्यात सोयाबीनची काढणी कामे सुरुच आहेत. त्यामुळे काढणी कामे उरकल्यानंतर शेतीची मशागत आणि पुन्हा पेरणी केली जाणार आहे. (Additional rains to sow rabi season late, need proper planning)

संबंधित बातम्या :

रब्बी हंगाम : पुसा वाणाच्या गव्हाची लागवड करा अन् विक्रमी उत्पादन मिळवा

काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही

यंदा सोयाबीन घाट्यातच ; हंगामातील सर्वात कमी दर, शेतकरी चिंतेत

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....