वर्धा – शेतातील उभ्या असलेल्या पीकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी (farmer) लाकडी मचाण तयार करुन शेतात वस्तीला थांबतात. पण शेतकऱ्यांना शेतात थांबल्यानंतर अनेक अडचणी येतात. ती समस्या एका शेतकरी पुत्राने सोडवल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील (wardha) कासारखेडा (kasarkheda) येथील योगेश लिचडे याने मजबूत स्ट्रक्चरचं सुविधायुक्त मचाण तयार केलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे.