Budget 2022 : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता, पायाभूत सुविधांचा विकास, निर्यातीला प्रोत्साहन मिळणार?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

Budget 2022 : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता, पायाभूत सुविधांचा विकास, निर्यातीला प्रोत्साहन मिळणार?
शेतकरी (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 6:47 AM

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजाराप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल घडवावेत यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी सादर करत असलेल्या या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी (Agriculture Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी गुंतवणूक योजना जाहीर केली जाऊ शकते. शेतकऱ्यांना यासाठी अनुदान देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार सरकार शेत मालाचे मूल्यवर्धन आणि बॅकवॉर्ड लिंकेजेस यांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी गुंतवणुकीचं सहाय्य करण्याची शक्यता आहे. यामुळे देशात शेतकऱ्यांना निर्यात करण्यासाठी मदत होईल आणि बाजारात शेतमाल पोहोचवण्यासाठी देखील सुलभता येईल, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अन्नप्रक्रिया उद्योगावर विशेष नजर

सरकार विविध प्रकारच्या शेतमालाच्या उत्पादनाच्या निर्यातीसाठी वाहतूक, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करू शकतं. सरकारनं गेल्या वर्षी सहकार मंत्रालयाची मोठी घोषणा केली होती. सहकार मंत्रालयाला आर्थिक ताकद देण्याचा निर्णय देखील या बजेटमध्ये होऊ शकतो. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सरकारनं पहिल्यांदा 10900 कोटी रुपये प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना जाहीर केलेली आहे. या क्षेत्रात साठवणूक, वाहतूक सोयीसुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी अजून एका वेगळ्या पीएलई योजना घोषित होण्याची शक्यता आहे. शेती क्षेत्रातील एकूण सकल उत्पादनात 11.1 38 टक्के हिस्सा हा अन्नप्रक्रिया उद्योगातून येतो. सरकार अन्नप्रक्रिया उद्योगासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एका पिकावरील अवलंबित्व कमी करणार

इक्रा या संस्थेच्या अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी आपण तांदूळ निर्यातीवरील भर कमी करून कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन आणि ते निर्यात केल्यास ते अधिक टिकावू आणि फायदेशीर ठरेल असे म्हटलंय. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांचं एका पिकावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे, असे देखील म्हटले आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज आणि प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं, असं तज्ञांचे मत आहे. कृषी उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाहून धोरण ठेवले पाहिजे ,असे देखील अर्थतज्ज्ञांनी सूचवलं आहे. साठवणूक आणि वाहतुकीच्या सोयीमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावं, असं देखील अर्थतज्ज्ञांना वाटतं.

इतर बातम्या:

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाच्या 35 हजार नव्या रुग्णांची नोंद

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, कोणत्या भागात पुरवठा बंद, घ्या जाणून!

Agriculture budget 2022 Narendra Modi government can announce sops for food processing sector in union budget by Nirmala Sitharaman

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.