AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Price: कांद्याचे भाव वाढण्याचं कारण काय? महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठांची स्थिती काय?

ऑनलाईन मार्केट म्हणजेच ई-नाम नुसार राज्यातील लोणंदमध्ये 1 मार्चला कांद्याचा दर 3600 रुपये क्विंटल होता. (Onion rates)

Onion Price: कांद्याचे भाव वाढण्याचं कारण काय? महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठांची स्थिती काय?
कांदा
| Updated on: Mar 02, 2021 | 6:33 PM
Share

मुंबई: देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ समजली जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर 1 ते 2 हजार 800 रुपयांदरम्यान राहिला. कांद्याचे दर सातत्यानं वाढत आहेत. गतवर्षी या काळात कांद्याचा दर 1450 रुपये क्विंटलच्या दरम्यान होता. सध्या उन्हाळी कांदा बाजार समित्यांमध्ये येत आहे. तरी देखील कांद्याचे दर कमी होत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात कांदा 50 रुपये किलोनं विकला जातोय. (Agriculture News why onion rates increasing Maharashtra market rates )

महाराष्ट्राच्या कांदा बाजारपेठांमधील दर

ऑनलाईन मार्केट म्हणजेच ई-नाम नुसार राज्यातील लोणंदमध्ये 1 मार्चला कांद्याचा दर 3600 रुपये क्विंटल होता. तर पंढरपूरमध्ये कांद्याचा दर 3200 रुपये इतका होता. तर दोन्ही बाजारपेठांमध्ये कांद्याचा कमाल दर 4 हजार रुपये क्विंटल राहिला. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी गेल्या वर्षाच्या तलनेत कांद्याची आवक निम्मी असल्याचं सांगितलं. त्यामुळे कांद्याचे दर वाढल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचं नुकसान होईल

भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झाले आहे. एका एकरामध्ये 120 क्विंटल कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी 45 क्विंटल कांदा खराब झाला. तो कांदा शेतामध्येच फेकून द्यावा लागला. एवढं संकट सोसून शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेत आणला आहे. त्याला कमी दर मिळाला तर त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या भाव कायम राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

कांद्याच्या लागवडीला खर्च किती?

राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाच्या 2017 च्या अहवालानुसार शेतकऱ्यांना एक किलो कांदा उत्पादित करण्यासाठी 9.34 रुपयांचा खर्च येतो. भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार लाल कांद्याला 24 ते 30 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. रब्बी हंगामामध्ये सरासरी 18 ते व24 रुपये दर मिळतोय. दर अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं नसतं तर कांद्याचा भाव 8 ते 14 रुपयांदरम्यान राहतो. सध्या कांद्याला चांगला दर मिळतोय मात्र नाशिक, पुणे,धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालयं. जानेवारी महिन्यातील 7 ते 10 तारखेदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या:

अवकाळीचा फटका कांद्याच्या बाजार भाववाढीचा सर्वसामान्यांना झटका

Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचला

(Agriculture News why onion rates increasing Maharashtra market rates)

Follow Us
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.