AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!

खरिपाच्या संपूर्ण हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती मालाची आवक ही जेमतेमच राहिली होती. सोयाबीन वगळता इतर पिकांची आवक झालीच नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट हे देखील यामागचे एक प्रमुख कारण होते. मात्र, आता चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. चार दिवसांपासून रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली असून दिवसेंदिवस आवकमध्ये वाढ होत आहे.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 12, 2022 | 2:30 PM
Share

लातूर : खरिपाच्या संपूर्ण हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Stock) शेती मालाची आवक ही जेमतेमच राहिली होती. सोयाबीन वगळता इतर पिकांची आवक झालीच नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट हे देखील यामागचे एक प्रमुख कारण होते. मात्र, आता चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. चार दिवसांपासून (Rabi Season) रब्बी हंगामातील (Arrival of Chickpeas) हरभऱ्याची आवक सुरु झाली असून दिवसेंदिवस आवकमध्ये वाढ होत आहे. चौथ्याच दिवशी हरभऱ्याची आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली आहे. तर दुसरीकडे अंतिम टप्प्यातील सोयाबीन विक्रीवरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 15 हजार पोत्यांची तर सोयाबीनच्या 17 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे कधी नव्हे ते बाजारपेठेत रेलचेल पाहवयास मिळाली आहे.

आवक वाढली दर मात्र स्थिरच

खरिपातील सोयाबीन आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवले असले तरी आता विक्रीला सुरवात केली आहे. सध्या सोयाबीनला सरासरी प्रमाणे 6 हजार 400 रुपये दर आहे. शेतकऱ्यांना दरात वाढ व्हावी असे वाटत असले तरी त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आहे त्या दरात सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहेत. दुसरीकडे तुरीची आवकही वाढत आहे. हमीभाव केंद्रावरील दर अन् खुल्या बाजारपेठेतील दर हे समसमानच झाल्याने शेतकरी आता व्यापाऱ्यांकडेच तुरीची विक्री करीत आहेत.

हरभऱ्याची आवक वाढली दर घसरलेलेच

रब्बी हंगामातील हरभऱ्याचीही आवक सुरु झाली आहे. वातावरणातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा धोका टाळण्यासाठी शेतकरी काढणी आलेल्या हरभऱ्याची राशणी करीत आहे. शिवाय यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. त्यामुळे हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात उत्पादन किती होऊ शकते याची चुणूक दाखवली आहे. चार दिवसांपासूनच आवक सुरु झाली तर शनिवारी 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. हरभऱ्याचे दर मात्र घटलेलेच आहेत. सध्या हरभऱ्याला 4 हजार 400 रुपये दर असून लवकरच हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारण हरभऱ्याला 5 हजार 400 रुपये हमीभाव ठरवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

ऊसाचे गाळप झाले आता पाचटाचेही महत्व जाणून घ्या..! आजचे व्यवस्थापन हेच उद्याचे उत्पादन

सरकारला जमले नाही ते प्रशासन करुन दाखणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी काय आहे नवा पर्याय?

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

Follow Us
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...