AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!

खरिपाच्या संपूर्ण हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती मालाची आवक ही जेमतेमच राहिली होती. सोयाबीन वगळता इतर पिकांची आवक झालीच नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट हे देखील यामागचे एक प्रमुख कारण होते. मात्र, आता चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. चार दिवसांपासून रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली असून दिवसेंदिवस आवकमध्ये वाढ होत आहे.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे.
| Updated on: Feb 12, 2022 | 2:30 PM
Share

लातूर : खरिपाच्या संपूर्ण हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Stock) शेती मालाची आवक ही जेमतेमच राहिली होती. सोयाबीन वगळता इतर पिकांची आवक झालीच नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट हे देखील यामागचे एक प्रमुख कारण होते. मात्र, आता चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. चार दिवसांपासून (Rabi Season) रब्बी हंगामातील (Arrival of Chickpeas) हरभऱ्याची आवक सुरु झाली असून दिवसेंदिवस आवकमध्ये वाढ होत आहे. चौथ्याच दिवशी हरभऱ्याची आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली आहे. तर दुसरीकडे अंतिम टप्प्यातील सोयाबीन विक्रीवरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 15 हजार पोत्यांची तर सोयाबीनच्या 17 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे कधी नव्हे ते बाजारपेठेत रेलचेल पाहवयास मिळाली आहे.

आवक वाढली दर मात्र स्थिरच

खरिपातील सोयाबीन आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवले असले तरी आता विक्रीला सुरवात केली आहे. सध्या सोयाबीनला सरासरी प्रमाणे 6 हजार 400 रुपये दर आहे. शेतकऱ्यांना दरात वाढ व्हावी असे वाटत असले तरी त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आहे त्या दरात सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहेत. दुसरीकडे तुरीची आवकही वाढत आहे. हमीभाव केंद्रावरील दर अन् खुल्या बाजारपेठेतील दर हे समसमानच झाल्याने शेतकरी आता व्यापाऱ्यांकडेच तुरीची विक्री करीत आहेत.

हरभऱ्याची आवक वाढली दर घसरलेलेच

रब्बी हंगामातील हरभऱ्याचीही आवक सुरु झाली आहे. वातावरणातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा धोका टाळण्यासाठी शेतकरी काढणी आलेल्या हरभऱ्याची राशणी करीत आहे. शिवाय यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. त्यामुळे हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात उत्पादन किती होऊ शकते याची चुणूक दाखवली आहे. चार दिवसांपासूनच आवक सुरु झाली तर शनिवारी 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. हरभऱ्याचे दर मात्र घटलेलेच आहेत. सध्या हरभऱ्याला 4 हजार 400 रुपये दर असून लवकरच हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारण हरभऱ्याला 5 हजार 400 रुपये हमीभाव ठरवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

ऊसाचे गाळप झाले आता पाचटाचेही महत्व जाणून घ्या..! आजचे व्यवस्थापन हेच उद्याचे उत्पादन

सरकारला जमले नाही ते प्रशासन करुन दाखणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी काय आहे नवा पर्याय?

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.