AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला जमले नाही ते प्रशासन करुन दाखणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी काय आहे नवा पर्याय?

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला घेऊन आतापर्यंत घोषणांचा पाऊस झाला मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी त्या अनुशंगाने काहीच पडले नाही. मात्र, शेती व्यवसयातील बदल केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालीच्या लक्षात आल्यानंतर आता जालना जिल्हा प्रशासन एका नव्या निर्णयावर येऊन ठेपले आहे.

सरकारला जमले नाही ते प्रशासन करुन दाखणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी काय आहे नवा पर्याय?
जालना येथील खरेदी केंद्रावरच आता रेशीम कोषची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 12, 2022 | 12:01 PM
Share

जालना : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला घेऊन आतापर्यंत घोषणांचा पाऊस झाला मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी त्या अनुशंगाने काहीच पडले नाही. मात्र, शेती व्यवसयातील बदल केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालीच्या लक्षात आल्यानंतर आता (Jalna district administration) जालना जिल्हा प्रशासन एका नव्या निर्णयावर येऊन ठेपले आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये (Silk Farming) रेशीम शेतीचे क्षेत्र वाढलेले आहे. शिवाय (Directorate General of Silk) रेशीम महासंचालनालय येथे बाजारपेठही खुली केली आहे. त्यामुळे आता हा बदल स्वीकारुन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीची संधी आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. वाढते क्षेत्र आणि शेतकऱ्यांना झालेला फायदा लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनीच याबाबत बैठक घेऊन यंदा 1 हजार 800 एकरावर तर आगामी पाच वर्षामध्ये 5 हजार एकरावर तुती लागवडीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विकेल तेच पिकवले तर दुहेरी फायदा होणार आहे.

कसे आहे प्रशासनाचे नियोजन?

जालना जिल्ह्यात रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ उपलब्ध झाल्यापासून शेतकऱ्यांना अधिकचा लाभ होऊ लागला आहे. शिवाय पारंपरिक पिकातून पदरी केवळ निराशाच हे लक्षात आल्यानंतर शेतकरीही आता बदलाच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे या महिन्यातच पोकरा, मनगेरा, शेतकऱ्यांच्या रोपवाटिका आणि वनीकरण विभागाच्या रोपवाटिका या माध्यमातून 55 लाख तुतीची रोपे तयार करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रोपासाठी भटकंती होणार नाही. वेळेत तुतीची लागवड झाली तर उत्पादनात फरक पडणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ते नियोजन केले जात आहे.

असा मिळतो शेतकऱ्यांना लाभ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी तुती लागवडी व कीटक संगोपन गृह बांधकामासाठी मंजुरी व सामग्रीसाठी प्रतिएकर 3 लाख 32 हजार 740 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी लाभ देण्यात येणार आहे. तुती लागवडीपासून ते रेशीम उद्योगापर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला जातो. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक विभागाने रेशीम शेती प्रकल्प मिशन मोडवर अवंबण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

अशी होते गावांची निवड अन् आवश्यक कागदपत्रे

रेशीम उद्योग वाढवण्यासाठी गावागावात जाऊन अधिकारी हे इच्छूक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. या गावांची निवड ही तहसील कार्यालयातून गावचे बागायत क्षेत्र घेतले जाते त्यानुसार निवड होते तर रेशीम उद्योगासाठी इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करताना सातबारा, 8 अ नमुना, आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॅाक्स, दोन फोटो आणि रेशीम मंडळाच्या अर्जाचा नमुना हा शेतकऱ्यांना भरुन द्यावा लागणार आहे. त्यानुसार मार्गदर्शन केले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

अवकाळी- अतिवृष्टीनंतर आता नवीनच संकट, फळबागांना कशाचा धोका ? वाचा सविस्तर

काय सांगता? शास्त्रीय संगीत ऐकूण गायीच्या दूध उत्पादनात वाढ, तरुण शेतकऱ्याचा अनोखा अंदाज

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!