AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट, फळ पिकामध्ये समावेश झाल्याने मिळणार का मदतीचा हात..!

हंगामाच्या सुरवातीला केळीच्या घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत होता. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीची जोपासणा केली पण 400 ते 500 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय आता इतर फळपिके बाजारातून गायब होताच केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. हे सर्व असले तरी तोडणीला आलेली केळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त होत आहे.

Jalgaon : वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट, फळ पिकामध्ये समावेश झाल्याने मिळणार का मदतीचा हात..!
वादळी वाऱ्याने जळगावमध्ये केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 12:16 PM
Share

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून (Maharashtra) राज्यातील अनेक जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत असली तरी वादळी वाऱ्याची अवकृपाच म्हणावी लागेल. कारण सुरवातीला मराठवाडा, विदर्भ आणि आता जळगावात वाऱ्यामुळे (Banana Garden) केळी बागा ह्या आडव्या झाल्या आहेत. केळी तोडणीला आली असतानाच हे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावल्याप्रमाणे सध्याची स्थिती आहे. खरिपासाठी पाऊस हा गरजेचा आहे पण वादळी वाऱ्यामुळे (Jalgaon) जिल्ह्यात अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब हे पडले आहेत तर अनेक गावचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे पावसाची आवश्यकता असली तरी बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त आहेत.  शिवाय केळी हे फळपिक असल्याची घोषणा मध्यंतरीच राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आता नुकसानभरपाईत याचा काही उपयोग होईल का हे पहावे लागणार आहे.

उत्पादनाऐवजी चिखलाने माखलेली केळी उचलण्याची वेळ

हंगामाच्या सुरवातीला केळीच्या घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत होता. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीची जोपासणा केली पण 400 ते 500 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय आता इतर फळपिके बाजारातून गायब होताच केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. हे सर्व असले तरी तोडणीला आलेली केळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त होत आहे. जिल्ह्यात शेकडो एकरातील केळी बागा ह्या जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका भडगाव, चोपडा, अमळनेर, या तालुक्याती उत्पादकांना बसलेला आहे.

घरांची पडझड अन् जनावरेही दगावली

पावसापेक्षा वादळी वारे अधिक असल्याने नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यात वाऱ्याने 15 घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतिही जिवीत हानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसात जनावरांची देखील जिवीतहानी झाली आहे. नुकसानग्रस्त भागाची प्रशासनाकडून पाहणी सुरू असून पंचनामे सुरू करण्यात आदेश देण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

जळगाव जिल्ह्यात केळी हे मुख्य फळपिक आहे. शिवाय तोडणीला आलेल्या केळीचेच अधिकचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून केळी बागांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी थेट बांधावर दाखल होत आहेत. केळीचा आता फळ पिकात समावेश केल्याने अधिकच्या प्रमाणात नुकासनभरपाई मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. आता पंचनामे करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.