AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana Crop : दोन दिवसाच्या पावसात केळी बागा आडव्या, पालकमंत्र्यांचा सल्ला शेतकऱ्यांना पडेल का पचणी..!

जळगाव तालुक्यातील विटनेर भोकर आव्हाने या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली असून या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे नुकसान भरपाई ची आर्त हाक दिली आहे.

Banana Crop : दोन दिवसाच्या पावसात केळी बागा आडव्या, पालकमंत्र्यांचा सल्ला शेतकऱ्यांना पडेल का पचणी..!
जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने केळी बागांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 4:39 PM
Share

जळगाव : यंदाच्या वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (fruit orchard) फळ बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. केवळ अवकाळी पावसामुळेच नाहीतर आता हंगामातील पावसामुळे (Jalgaon) जळगावात (Banana Garden) केळी बागा आडव्या होत आहेत. पावसाबरोबरच वादळी वाऱ्याने सर्वकाही मातीमोल होत आहे. हंगामाच्या तोंडावर केळी बागांचे नुकसान हे दरवर्षीचे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता केळी व्यवस्थापनातच बदल केला तर यातून सुटका असल्याचा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. दोन दिवस जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे केळी बागा आडव्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे तोडणीच्या दरम्यानच ही अवस्था होत असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील रावेर यावल मुक्ताईनगर यासह जिल्ह्यात अनेक भागात केळी बागाचे नुकसान झाल्याने पालकमंत्री पाटील यांनी पीक पाहणी करुन पंचनामे कऱण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले

जळगाव तालुक्यातील विटनेर भोकर आव्हाने या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली असून या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे नुकसान भरपाई ची आर्त हाक दिली आहे. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे पीक जोपासायचे आणि उत्पन्न पदरात पडत असतानाच असे नुकसान यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. पीक पाहणी करुन नुकसानभरापाई मिळाली तरी उत्पादनाची बरोबरी होणार नाही. आतापर्यंत केळीची तोड होणे गरेजेच होते. पण मध्यंतरीच्या अवकाळीने सर्व गणित कोलमडले आहे.

तरच टळणार बाागांचे नुकसान

गेल्या पाच वर्षापासून जळगाव जिल्ह्यात सातत्याने वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे केळीच्या बागांचे नुकसान होत आहे.हे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन बदलण्याचा सल्ला दिला आहे. याकरिता कृषी विभागाने केळी लागवडीचा कालावधी ते उत्पादन मिळेपर्यंतच्या दरम्यान काय बदल करता येतो का ? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाय आता केळीला फळपिकाचा दर्जा मिळाल्याने मदत आणि उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना आशा

पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन दिवसातच जळगाव जिल्ह्यातील चित्र बदलले आहे. मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने केळी बागा उध्वस्त तर झाल्याच आहेत पण जमिनदोस्त झाल्याने त्यामधून उत्पादन पदरी पडेल अशी आशाच उरलेली नाही. पीक पाहणी करुन पालकमंत्री यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. सरकारच्या तत्परतेने मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.