AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची केळी फेकण्याची वेळ, नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा

लॉकडाऊन असल्यानं बबन त्रिकाळ यांच्यापुढे पाऊण एकर शेतातली केळी कशी विकायची असा प्रश्न निर्माण झालाय. (Banana Farmer corona lockdown)

लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची केळी फेकण्याची वेळ, नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा
केळी उत्पादक अडचणीत
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 01, 2021 | 5:38 PM
Share

बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गामुळं विविध क्षेत्रांना फटका बसलेला आहे. राज्यात कोरोना पन्हा वाढत असल्यानं काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आलेय. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विश्वी येथील शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ यांनाही याचा फटका बसलाय. लॉकडाऊन असल्यानं बबन त्रिकाळ यांच्यापुढे पाऊण एकर शेतातली केळी कशी विकायची असा प्रश्न निर्माण झालाय. केळी विकता येत नसल्याने जागेवरच गळून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. (Buldana Banana farmers facing problems due to Corona and lockdown)

शासनानं भरपाई द्यावी

विश्वी येथील बबन त्रिकाळ यांनी केळीचं लाखो रुपयांचे नुकसान होतेय. त्यामुळे त्रिकाळ यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केलीय. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. बुलडाणा जिल्ह्याच्या विश्वी येथील शेतकरी बबन त्रिकाळ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी त्यांच्या पाऊण एकरात केळीची लागवड केली होती.

लॉकडाऊन असल्यानं केळी विक्री संकटात

बबन त्रिकाळ यांनी आता केळी काढायला सुरुवात करणार होतो. मात्र, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालीय. यामुळे केळी विक्री करता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व्यापारीही भाव पाडून मागत आहेत, त्यामुळे खर्च ही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

केळी जागेवर पडून आर्थिक नुकसान

केळी जागेवरच खराब होऊन पडत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बबन त्रिकाळ यांनी त्यांच्यावर बँकेचे कर्ज असून ते कर्जबाजारी झाले आहेत. त्रिकाळ यांनी खासगी सावकाराकडून उसणवारीनं पैसे घेतले आहेत. केळी पिकाची शासनाने विल्हेवाट लावावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा मजबुरीने आत्मदहन करेन, अशा प्रकारचे निवेदन शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ यांनी मेहकर तहसीलदार यांना दिले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळं शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालीय. वास्तविक पाहता या साऱ्या समस्यांमध्ये “शेतकरी आणि शेती क्षेत्रावर”सर्वाधिक विपरीत परिणाम झालेला आहे.

संबंधित बातम्या

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

(Buldana Banana farmers facing problems due to Corona and lockdown)

Follow Us
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक