AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्याचे बदलले दिवस, रोज दहा हजार रुपयांचे उत्पन्न

शेतकरी आशुतोष रॉय यांनी सांगितले की, मार्च महिन्यात त्यांनी बाजारातून बी आणून लावले. पेरणी करण्यापूर्वी शेतीची नांगरणी केली.

भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्याचे बदलले दिवस, रोज दहा हजार रुपयांचे उत्पन्न
| Updated on: Jun 15, 2023 | 9:19 PM
Share

नवी दिल्ली : शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. काही शेतकरी पारंपरिक शेतीचे आधुनिकीकरण करतात. तर काही शेतकरी वेगळी वाट निवडतात. भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याची ही सक्सेस स्टोरी. बिहारच्या बक्सर जिल्ह्याचे शेतकरी परंपरातगत शेतीसह भाजीपाल्याची शेती करत आहेत. यातून शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत चांगला फायदा होत आहे. शेतकरी एकाच शेतीत वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड करत आहेत. यातून आशुतोष राय एक चांगले शेतकरी झाले. त्यांनी दोन बिघा जमिनीत दोडके आणि काकडीची शेती केली. ते सांगतात की, गेल्या २० वर्षांपासून ते भाजीपाल्याची शेती करत आहेत. हिरवा भाजीपाला विकून ते चांगले उत्पन्न घेतात.

न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, शेतकरी आशुतोष राय यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि आजोबा पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. त्यातून खर्च जास्त आणि फायदा कमी होत होता. परंतु, त्यांनी आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड केली. भाजीपाला आणि फळबाग लागवड सुरू केली. यात कमी खर्चात फायदा जास्त झाला. ते सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेतात. त्यामुळे त्यांचा भाजीपाला बाजारात लगेच विकतो.

सुमारे दोन महिने हिरव्या भाजीपाल्याची विक्री

मार्च महिन्यात त्यांनी बीज टाकून दोडके आणि काकडीची लागवड केली. सहा फूट अंतरावर दोडके लावले. मध्यंतरी काकडी लागली. मध्यंतरी पिकांना पाणी देतात. त्यामुळे दोन महिन्यात भाजीपाल्याची विक्री सुरू झाली.

भाजीपाल्याच्या शेतीत जास्त फायदा

आशुतोष रोज १० रुपये किलोच्या भावाने दोडके विकत आहेत. यातून त्यांना रोज दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शिवाय काकडी विकूनही चांगली कमाई करत आहेत. एक एकर जमिनीत भाजीपाला लागवडीचा खर्च सुमारे २० हजार रुपये येतो. शिवाय कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. तरीही भाजीपाला शेतीत चांगले उत्पन्न मिळते.

दैनंदीन जीवनात भाजीपाला लागतो. तो विक्री करून चांगले पैसे कमवले जाऊ शकतात. त्यामुळे भाजीपाला लागवड करून शेतकरी चांगली प्रगती करू शकतात. त्यासाठी नियमित मेहनत करावी लागते.

Follow Us
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.