AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : राज्यभरातील शेतीच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे. या भागात सुमारे दोन लाख हेक्टर पिकाच्या पेरण्या झाल्या असून सर्वाधिक गहू पिकाची लागवड झाली आहे.

Agriculture News : राज्यभरातील शेतीच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर
farmerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 24, 2023 | 12:22 PM
Share

वाशिम : जिल्हाभरात काही दिवसांपासून दर दोन दिवसाला वातावरणात (Climate change) बदल होत आहे. कधी उष्णता (heat) वाढत आहे. तर कधी थंड वारे वाहत आहेत. हार्वेस्टरच्या (Harvester Farms) सहाय्याने गव्हाची काढणी केली जाते. त्यामुळे अगदी काही तासामघ्ये शेतातच काढणी केली जात असल्याने शेतकरी (washim farmer) हार्वेस्टरला अधिक पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सुध्दा वातावरण बदलामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम झाला आहे.

सध्या स्थितीत कांद्याला फुलधारणा

वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणाऱ्या दरामुळे पारंपारिक शेती तोट्यात जात आहे. त्यामुळं वाशिम जिल्ह्यात शेतकरी कांदा बिजोत्पादनकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील युवा शेतकरी समीप राऊत यांनी पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत, आपल्या दोन एकर शेतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बीजवाई कांद्याची लागवड केली. सध्या स्थितीत कांद्याला फुलधारणा झाली असून, पीक चांगलेच भरलेले असून मजुरी आणी बियाना चा खर्च वगळता त्यांना सव्वातीन लाख रुपये निव्वळ नफा होण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा आहे.

फायदा रब्बी पिकांना

धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे. या भागात सुमारे दोन लाख हेक्टर पिकाच्या पेरण्या झाल्या असून सर्वाधिक गहू पिकाची लागवड झाली आहे. सध्या गहू काढून कृषी उत्पन्न बाजार समिती विकला जात आहे. मात्र या गव्हाला भाव नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.

हरभरा या पिकाचे उत्पन्न चांगले

धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झालेला आणि उशिरापर्यंत चालत असलेल्या पावसामुळे या वर्षाचा रब्बी हंगा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. रब्बी हंगामात घेतले गेलेले गेलेले गहू, हरभरा या पिकाचे उत्पन्न चांगले निघाले आहे. मात्र असे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र गावाला भाव नसल्याने शेतकरी नाराज आहे. गव्हाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च वजा जाता हातात काही पडत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .दोन आठवड्यापूर्वी गवाला तीन हजार रुपये इतका भाव होता. मात्र आता हा भाव अवघ्या 2200 ते 2400 रुपयाला आला आहे. त्यामुळे तीन हजार रुपये भाव मिळावा अशा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.