AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Crop : खरिपात बहरणार ‘पांढर सोनं’, दर वाढीचा परिणाम की आणखीन काही? वाचा सविस्तर

उत्पादन वाढले तर दर कमी होणार याची धास्ती शेतकऱ्यांना असते, पण कापसाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण यंदा उत्पादन घटल्याने मागणी एवढा पुरवठा हा झालेलाच नाही. त्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढले तरी खरेदीविना त्याची परवेड होणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा अधिक की कापसाचा हेच पहावे लागणार आहे.

Cotton Crop : खरिपात बहरणार 'पांढर सोनं', दर वाढीचा परिणाम की आणखीन काही? वाचा सविस्तर
यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे.
| Updated on: May 04, 2022 | 4:10 PM
Share

जळगाव : आतापर्यंत कापसाचे दर आणि साठवूक याची चर्चा होती पण आता (Kharif Season) खरीप हंगामाचे वेध लागले असून यंदाच्या खरिपात कापूस लागवडीचे चित्र काय राहणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. (Cotton Rate) कापसाला मिळालेला विक्रमी दर आणि वाढती मागणी या दोन्ही बाबी यंदा (Cotton Cultivation) कापूस लागवडीसाठी पोषक राहणार आहेत. यंदाचा कापूस हंगामही देशासाठी चांगला राहणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. विक्रमी दरापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढले तरी विक्रीची हमी मिळत आहे. याच कारणामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.

उत्पादन वाढले तरी चिंता नाही

उत्पादन वाढले तर दर कमी होणार याची धास्ती शेतकऱ्यांना असते, पण कापसाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण यंदा उत्पादन घटल्याने मागणी एवढा पुरवठा हा झालेलाच नाही. त्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढले तरी खरेदीविना त्याची परवेड होणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा अधिक की कापसाचा हेच पहावे लागणार आहे.

पोषक वातावरण राहिल्यास उत्पादनात वाढ

गेल्या काही वर्षापासून शेती उत्पादनात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे गतवर्षी सरासरीएवढेही कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांचे पदरी पडले नाही. यंदा तर पोषक वातावरण राहिले तर देशात 2 दशलक्ष टनांनी उत्पादन वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जगभरात लागवड क्षेत्राच वाढ तर निश्चित मानली जात आहे पण उत्पादन हे निसर्गावरच अवलंबून आहे.मात्र, कापूस उत्पादित झाला तर मात्र, शेतकऱ्यांचाच अधिकचा फायदा होणार आहे.

सोयाबीन-कापसामध्ये स्पर्धा

खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. यंदा सोयाबीनला सरासरीएवढा दर मिळाला तर कापसाच्या दरात दुप्पटीने वाढ झाली होती. त्यामुळे ज्या भागात कापसाकडे दुर्लक्ष केले गेले होते त्या क्षेत्रात आता काय होणार हे पहावे लागणार आहे. यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ ही निश्चित मानली जाते. पण शेतकऱ्यांनी जो पीक पध्दतीमध्ये बदल केला जाणार आहे त्याचा फायदा  होईल की नाही हे पहावे लागणार आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.