AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मागच्या आठदिवसात महाराष्ट्रात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

Agriculture News : पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Crop Insurance CompanyImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 14, 2023 | 8:56 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : मागच्यावर्षी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई पिकविमा कंपनीने (Crop Insurance Company) द्यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (buldhana Malkapur) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर तशा पद्धतीचे निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याकडे शेतकऱ्यांनी (Farmer) दिले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा संरक्षण योजना काढली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पिकविमा प्रीमियम भरून काढला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मलकापूर तालुक्यातील काही शिवारांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी रितसर पिकविमा कंपनीकडे तक्रार अर्ज करून देखील त्या पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंज्या प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली. ही रक्कम अतिशय तोकडी असल्यामुळे शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम सुद्धा शेतकऱ्यांना परत मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मागच्या आठदिवसात महाराष्ट्रात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. आता सरकार कधी शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.

मिरची अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काल रात्री नंदुरबार, नवापूर तळोदा आणि शहादा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसा सह गारपीट झाल्याने काढण्यासाठी आलेला हरभरा, गहू, मका, ज्वारी, झाला आहे तर फळबागातील टरबूज, खरबूज, केळी, पपई आणि मिरची पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसोबतच नंदुरबार मधील मिरची व्यापाऱ्यांनाही आवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे नंदुरबार बाजार समिती मध्ये खरेदी केलेली मिरची अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.