AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर

अवकाळी पावसामुळे मिल्ड्यूचा प्रादुर्भाव त्यामुळे द्राक्षांचे नुकसान झाले होते. दरम्यानच्या काळात विविध फवारण्या करुन पिकाचे संरक्षण करण्यात शेतकरी हे यशस्वी झाले. यातून सावरत असतानाच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत.

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी व्यापारी दाखल होत आहेत.
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 10:13 AM
Share

लासलगाव : वातावरणातील बदलाचा परिणाम काय असतो ते यंदा (Vineyards) द्राक्ष बागांच्या झालेल्या अवस्थेवरुन लक्षात येत आहे. ऐन फलधारणा होण्याच्या प्रसंगी सुरु झालेली संकटाची मालिका आता द्राक्ष तोडणीच्या प्रसंगीही कायम आहे. अवकाळी पावसामुळे मिल्ड्यूचा प्रादुर्भाव त्यामुळे (Damage Grape) द्राक्षांचे नुकसान झाले होते. दरम्यानच्या काळात विविध फवारण्या करुन पिकाचे संरक्षण करण्यात शेतकरी हे यशस्वी झाले. यातून सावरत असतानाच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. अखेर जे संकट टळावे म्हणून शेतकऱ्यांनी अविरत प्रयत्न केले मात्र, (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने अखेर न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत असून द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे निर्यातीस अडचणी निर्माण होत असून शेतकरी आता स्थानिक बाजारपेठ जवळ करुन विक्री करीत आहेत.

अखेर अंतिम टप्प्यात पदरी नुकसानच

गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी, गारपिट, वाढता गारठा यामधून द्राक्षांचे नुकसान टळावे याकरिता एक ना अनेक उपायोजना केल्या मात्र, थंडीने जे नुकसान झाले ते न भरुन निघणारेच आहे. थेट द्राक्षांच्या मण्यालाच तडे गेले आहेत. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत वाया गेली आहे. आता उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरात पडावा म्हणून स्थानिक बाजारपेठेचा आधार घेतला जात आहे. सर्वकाही सुरळीत असताना केवळ निसर्गाच्या लहरीपणामुळे गणितच बिघडले आहे. अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा असताना आता झालेला खर्चही निघणे मुश्किल झाल्याचे शेतकरी चंद्रभान जाधव यांनी सांगितले आहे.

निर्यातीमध्येही अडचणी

द्राक्षाची निर्यात करण्यासाठी त्याच्या दर्जाचे मुल्यमापन केले जाते. यंदा द्राक्षांच्या गुणवत्तेवर तर परिणाम झालाच आहे पण थंडीमुले थेट तडेच गेल्याने निर्यातीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. व्यापाऱ्यांकडून मागणीच नसल्याने आता शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठांचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दर तर कमी मिळणार आहे पण ओढावलेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता अधिकच्या उत्पन्नाची नाही तर वर्षभर झालेला खर्च तरी भरुन निघावा ही अपेक्षा आहे.

दर ठरले मात्र, अडचणी कायम

वातावरणातील बदल, वर्षभर झालेला खर्च हे पाहता उत्पादनावर 10 टक्के तरी फायदा मिळावा म्हणून द्राक्ष उत्पादक संघाने जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो असा दर ठरवला होता. पण याला निर्यातदार व्यापाऱ्यांचा पहिल्यापासूनच विरोध राहिलेला आहे. आता तर थेट मालावरच परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत एवढा दर मिळणे शक्य नाही. त्यामुळे मिळेल त्या दरात द्राक्ष विक्री करण्याची नामुष्की ओढावणार असल्याचे शेतकरी गोकूळ जाधव यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Positive News: खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघणार..! सोयाबीनला फलधारणा

सोलापूर बाजार समितीत 61 वर्षातील कांद्याची विक्रमी आवक, 1200 गाड्यांची आवक, 16 कोटींची उलाढाल

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत अन् खताचेही व्यवस्थापन, जाणून घ्या काय आहेत फायदे?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.