AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसंत ऋतूत पिवळा पळस बहरला, झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेतायेत, बहुआयामी उपयोग तुम्हाला माहित आहे का ?

रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आली की, हमखास आठवण होते. ती पळसाच्या फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केशरी पळसफुले वसुंधरेच सौंदर्य खुलवतात.

वसंत ऋतूत पिवळा पळस बहरला, झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेतायेत, बहुआयामी उपयोग तुम्हाला माहित आहे का ?
लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 26, 2023 | 10:03 AM
Share

वाशिम : वसंत ऋतु (Spring season) लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते. मात्र वाशिम (washim) जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे. हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून, औषधीसाठीही या पिवळ्या पळस फुलांचा (palm tree) वापर होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे. वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात

रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आली की, हमखास आठवण होते. ती पळसाच्या फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केशरी पळसफुले वसुंधरेच सौंदर्य खुलवतात. लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात, मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठीही या फुलांचा बहुआयामी उपयोग आहे असे तज्ज्ञ सांगतात.

गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला…

पिवळ्या पळसाबद्दल काही अंधश्रद्धादेखील प्रचलित आहेत. गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. त्यामुळे जादूटोणा करणारे तांत्रिक-मांत्रिक नेहमीच या झाडाच्या शोधार्थ असतात. पळस फुलांना ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ अर्थात जंगलातील ज्वाला अशी इंग्रजांनी उपमा ‌दिली आहे.

फुललेला पळस सर्वांनाच आवडतो

पळसाला जसा आकार नाही, तसाच त्याच्या आकर्षक फुलांना गंधही नाही. परंतु फुललेला पळस सर्वांनाच आवडतो. कारण पळस फुलला की, संपूर्ण जंगल लाल रंगांनी न्हाऊन निघते. अशा बहुगुणी आणि त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा असाच, पिवळा पळस सध्या वाशीम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा परिसरात समृद्धी महामार्गालगत बहरला असून, लक्ष येणाऱ्या जाणाऱ्यांचे वेधून घेत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.