AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season :  पीक कर्जाचे वाटप कासव गतीने, शेतकरी अडचणीत असतानाही बँकांचा आखडता हात, व्यापारी बँकांचा मनमानी कारभार

मराठवाड्यात खरीप हंगामात पीककर्ज वाटप करताना यंदाही व्यापारी बँकांनी हाथ आखडताच घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेनी दिलेल्या उद्दिष्टांच्या आसपास शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, 6728 कोटी 54 लाखांचे उदिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 1734 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शिवाय आता हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना व्यापारी बॅंक उद्दिष्ट पूर्ण करणार कशी असा सवाल उपस्थित आहे.

Kharif Season :  पीक कर्जाचे वाटप कासव गतीने, शेतकरी अडचणीत असतानाही बँकांचा आखडता हात, व्यापारी बँकांचा मनमानी कारभार
खरीप हंगामात दुबार पेरणी करावी लागत असतानाही शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 22, 2022 | 9:35 AM
Share

नांदेड : (Kharif Season) खरीप अन् रब्बी हंगामातील पेरणी ही पैशाविना रखडू नये म्हणून हंगामाच्या सुरवातीलाच (Crop Loan) पीक कर्ज योजना ही राबवली जाते. यंदा तर महाराष्ट्र सरकारने अर्थसंल्पात तरतूद करताच अंमलबजावणीबाबत बॅंकांना कर्ज वितरणाचा सूचना केल्या होत्या. असे असतानाही आता खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात असतानाही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सोडा शेतकऱ्यांना मागणीनुसार देखील पुरवठा झालेला नाही. केवळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिलेल्या उद्दिष्टानुसार वाटप केले आहे. (Nanded District) नांदेड जिल्ह्यासह मराठावाडा विभागात व्यापारी बॅंकांनी मात्र, हाथ आखडताच ठेवलेला आहे. गत तीन महिन्याच्या काळात या बॅंकेने नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा लहरीपणा अन् दुसरीकडे सुल्तानी संकट कायम असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. आता उर्वरित काळात ही बॅंक उद्दिष्टपूर्ती करणार का नाही हे पहावे लागणार आहे.

शासन आदेशाला केराची टोपली

कोणतीही औपचारिकता न बाळगता अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीनुसार पीक कर्जाचे वाटप करावे अशा सूचना राज्य सरकारने बॅंकांना दिल्या होत्या. शिवाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे वर्षभरात पूर्ण करायचे असते त्यामुळे अनेक बॅंका हा आर्थिक वर्ष संपत असताना कर्जाचे वितरणावर भर देत होत्या. मात्र, नियमावलीत बदल करीत 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या सूचना असतानाही व्यापारी बॅंकांना त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे सरकारचा उद्देश आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल का नाही याबाबत संभ्रमता कायम आहे.

नांदेड जिल्ह्यातील काय आहे स्थिती?

मराठवाड्यात खरीप हंगामात पीककर्ज वाटप करताना यंदाही व्यापारी बँकांनी हाथ आखडताच घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेनी दिलेल्या उद्दिष्टांच्या आसपास शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, 6728 कोटी 54 लाखांचे उदिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 1734 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शिवाय आता हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना व्यापारी बॅंक उद्दिष्ट पूर्ण करणार कशी असा सवाल उपस्थित आहे. शेतकऱ्यांनी बॅंकांच्या दरात येण्यापूर्वी बॅंक अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज द्यावी अशा सूचना होत्या. परंतू, प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने नांदेड जिल्ह्यात या बॅंकेने केवळ 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे.

पीक कर्जाचा उद्देश काय ?

सध्या शेत शिवारात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज लक्षात घेता ही पीक कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. तीन टक्के व्याजजराने परतफेड आणि नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमध्ये सूट असे योजनेचे स्वरुप आहे. यंदा निसर्गाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणी असल्याने या कर्जाची गरज आहे तर दुसरीकडे बॅंका हात आखडता घेत आहेत.

Follow Us
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?