AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season :  पीक कर्जाचे वाटप कासव गतीने, शेतकरी अडचणीत असतानाही बँकांचा आखडता हात, व्यापारी बँकांचा मनमानी कारभार

मराठवाड्यात खरीप हंगामात पीककर्ज वाटप करताना यंदाही व्यापारी बँकांनी हाथ आखडताच घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेनी दिलेल्या उद्दिष्टांच्या आसपास शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, 6728 कोटी 54 लाखांचे उदिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 1734 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शिवाय आता हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना व्यापारी बॅंक उद्दिष्ट पूर्ण करणार कशी असा सवाल उपस्थित आहे.

Kharif Season :  पीक कर्जाचे वाटप कासव गतीने, शेतकरी अडचणीत असतानाही बँकांचा आखडता हात, व्यापारी बँकांचा मनमानी कारभार
खरीप हंगामात दुबार पेरणी करावी लागत असतानाही शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही.
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 9:35 AM
Share

नांदेड : (Kharif Season) खरीप अन् रब्बी हंगामातील पेरणी ही पैशाविना रखडू नये म्हणून हंगामाच्या सुरवातीलाच (Crop Loan) पीक कर्ज योजना ही राबवली जाते. यंदा तर महाराष्ट्र सरकारने अर्थसंल्पात तरतूद करताच अंमलबजावणीबाबत बॅंकांना कर्ज वितरणाचा सूचना केल्या होत्या. असे असतानाही आता खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात असतानाही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सोडा शेतकऱ्यांना मागणीनुसार देखील पुरवठा झालेला नाही. केवळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिलेल्या उद्दिष्टानुसार वाटप केले आहे. (Nanded District) नांदेड जिल्ह्यासह मराठावाडा विभागात व्यापारी बॅंकांनी मात्र, हाथ आखडताच ठेवलेला आहे. गत तीन महिन्याच्या काळात या बॅंकेने नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा लहरीपणा अन् दुसरीकडे सुल्तानी संकट कायम असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. आता उर्वरित काळात ही बॅंक उद्दिष्टपूर्ती करणार का नाही हे पहावे लागणार आहे.

शासन आदेशाला केराची टोपली

कोणतीही औपचारिकता न बाळगता अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीनुसार पीक कर्जाचे वाटप करावे अशा सूचना राज्य सरकारने बॅंकांना दिल्या होत्या. शिवाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे वर्षभरात पूर्ण करायचे असते त्यामुळे अनेक बॅंका हा आर्थिक वर्ष संपत असताना कर्जाचे वितरणावर भर देत होत्या. मात्र, नियमावलीत बदल करीत 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या सूचना असतानाही व्यापारी बॅंकांना त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे सरकारचा उद्देश आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल का नाही याबाबत संभ्रमता कायम आहे.

नांदेड जिल्ह्यातील काय आहे स्थिती?

मराठवाड्यात खरीप हंगामात पीककर्ज वाटप करताना यंदाही व्यापारी बँकांनी हाथ आखडताच घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेनी दिलेल्या उद्दिष्टांच्या आसपास शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, 6728 कोटी 54 लाखांचे उदिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 1734 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शिवाय आता हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना व्यापारी बॅंक उद्दिष्ट पूर्ण करणार कशी असा सवाल उपस्थित आहे. शेतकऱ्यांनी बॅंकांच्या दरात येण्यापूर्वी बॅंक अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज द्यावी अशा सूचना होत्या. परंतू, प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने नांदेड जिल्ह्यात या बॅंकेने केवळ 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे.

पीक कर्जाचा उद्देश काय ?

सध्या शेत शिवारात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज लक्षात घेता ही पीक कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. तीन टक्के व्याजजराने परतफेड आणि नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमध्ये सूट असे योजनेचे स्वरुप आहे. यंदा निसर्गाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणी असल्याने या कर्जाची गरज आहे तर दुसरीकडे बॅंका हात आखडता घेत आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.