AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो? मिळते का सूट? जाणून घ्या टॅक्सचं गणित

Agricultural Land Tax : शेत जमिनीचा व्यवहाराप्रकरणी लागलीच कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो असा अनेकांचा समज आहे. शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो का? सूट मिळते का? जाणून घ्या टॅक्सचं गणित

शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो? मिळते का सूट? जाणून घ्या टॅक्सचं गणित
शेतजमीन विकल्यावर कर द्यावा लागतो?
| Updated on: Aug 29, 2026 | 2:57 PM
Share

शेतजमीन विक्री केल्यावर प्रत्येक वेळी कॅपिटल गेन टॅक्स भरण्याची गरज नसते. आयकर कायद्यात ग्रामीण भागातील जमीन ही भांडवली मालमत्ता म्हणून कॅपिटल ॲसेट ग्राह्य धरली जात नाही. जमीन विक्रीतून जो नफा होतो, त्यावर कॅपिटल गेन टॅक्स आकारल्या जात नाही. पण शहरी अथवा निमशहरी भागातील जमीन असेल आणि त्या खरेदी-विक्रीतून नफा होत असेल तर कर आकारला जाऊ शकतो. मालकाकडे किती काळ जमीन होती यावर हा सगळा खेळ अवलंबून असतो.

ग्रामीण भागात करमाफीचा लाभ

शेतजमीन विक्री केल्यानंतर कराचा भरणा करावा लागतो का? असा सवाल अनेकांच्या मनात येतो. तर ग्रामीण भागात कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही. ग्रामीण भागात जमीन असेल तर त्यावर कर्जमाफीचा लाभ मिळतो. पण नगरपालिका अथवा कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत जमीन येत असेल तर मात्र अशा विक्रीवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. अर्थात हे गणित जमीन मालकाच्या किती वर्षे ताब्यात होती यावर अवलंबून आहे. शहरी भागातील जमीन विक्री व्यवहारावर कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. जमीन किती वर्षे मालकीची होती, त्यावर कराचे गणित अवलंबून आहे.

कर आकारताना या गोष्टींचा विचार

आयकर कायदानुसार, एखादी कृषी जमीन ग्रामीण अथवा शहरी भागात आहे त्यावर कर आकारल्या जातो. नगरपालिका अथवा कॅन्टोमेंट बोर्डापासून जमिनीचे अंतर आणि लोकसंख्याही विचारात घेतली जाते. नगरपालिका अथवा बोर्डाची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा कमी असेल तर मात्र कृषी जमिनीबाबत वेगळे धोरण असते. त्यावेळी कर लागत नाही. मात्र लोकसंख्या अधिक असेल आणि शहराच्या हद्दीत ही जमीन येत असेल तर कर भरावा लागतो.

नगरपालिका आणि शहराच्या हद्दीपासून दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील कृषी जमीन ग्रामीण भागातील मानली जाते

नगरपालिका, शहराच्या हद्दीपासून 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर ती जमीन ग्रामीण भागातील मानली जाते

8 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर ती जमीन ग्रामीण भागातील मानली जाते

या तीनही पर्यायांमध्ये हद्दीचा प्रभाव मानल्या जातो. लोकसंख्येचा परिणाम दिसून येत नाही.

आयकर कायद्यातील निश्चित लोकसंख्या आणि अंतराच्या अटींचा परिणाम दिसत नाही.

Follow Us
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर