AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याने द्राक्ष शेतीवर चालवली कुऱ्हाड, कर्ज भरणे सुद्धा मुश्किल…

नाईलाजास्तव द्राक्ष शेतीवर कुऱ्हाड चालवत असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन द्राक्ष शेती वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याने द्राक्ष शेतीवर चालवली कुऱ्हाड, कर्ज भरणे सुद्धा मुश्किल...
vineyardImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 02, 2023 | 1:00 PM
Share

सांगली : सांगलीच्या (Sangli) तासगाव (tasgaon) तालुक्यातील पेड येथील शेतकरी प्रकाश शिवाजी शिंदे यांनी कर्जबारी पणाला कंटाळून द्राक्षबाग (vineyard) तोडून टाकली आहे. वातावरणातील बदल आणि कष्ट करून फुलवलेली द्राक्षबाग तर व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे पाडलेले दर या सर्वातून सतत होणाऱ्या तोट्याला कंटाळून द्राक्ष शेतीवर कुऱ्हाड चालवून आपली खंत व्यक्त केली आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतीचं फक्त पंचनामा झाला आहे. अद्याप एकाही शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मदत मिळालेली नाही.

कर्ज भरणे सुद्धा मुश्किल झाले

शिंदे हे गेल्या पधरा वर्षांपासून द्राक्ष शेती करत आहेत. त्यांची २० गुंठे द्राक्षबाग आहे. पण अलीकडच्या काळात वातावरणातील बदल, वाढती महागाई, दर पाडणे, फसवणूक यामुळे गेली चार ते पाच वर्षे झाली, द्राक्ष शेती तोट्यात जात आहे. यातून कर्ज भरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. म्हणून नाईलाजास्तव द्राक्ष शेतीवर कुऱ्हाड चालवत असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन द्राक्ष शेती वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

८३० घरांची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात शुक्रवारी दुपारी जोदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने ४७९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले. या आपत्तीमध्ये ८३० घरांची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. तर 30 विद्युत पोल जमीनदोस्त झाल्याने वीज वितरण कंपनीचे सुद्धा मोठ नुकसान झाले आहे. तसेच शेकडो झाडांची पडझड झाली तर दोन चारचाकी कार व 4 दुचाकी चकनाचुर झाल्यात, तर वादळी वाऱ्याने बेघर झालेल्या लोकांना तातडीने नुकसान भरपाई व शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ