AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : धान खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम, पालकमंत्र्यांच्या पत्राने मिटणार का शेतकऱ्यांचा प्रश्न!

राज्यात धान खरेदीच्या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार खरेदीही सुरु झाली असून आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. केंद्राने ठरवून दिलेला कोटा हा मर्यादित असून तो वाढविण्यासंदर्भात आता राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आहे.

Chandrapur : धान खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम, पालकमंत्र्यांच्या पत्राने मिटणार का शेतकऱ्यांचा प्रश्न!
धान पीक
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 10:12 AM
Share

चंद्रपूर : राज्यात उशिरा का होईना (Paddy Production) धान खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. धान पिकाची काढणी होऊन महिना उलटला तरी खरेदी केंद्र ही सुरु झाली नव्हती. (State Government) राज्य शासनाच्या रेट्याने हा विषय मार्गी लागला असला तरी धान खरेदीच्या कोट्याचा प्रश्न हा कायम आहे. त्याअनुशंगाने आता (MSP) खरेदी केंद्रावरील कोटा वाढवून देण्याच्या मागणी संदर्भात पालकमंत्री पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता 2 ते 3 दिवसांमध्येदेखील हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची आशा आहे.

अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव

राज्यात धान खरेदीच्या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार खरेदीही सुरु झाली असून आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. केंद्राने ठरवून दिलेला कोटा हा मर्यादित असून तो वाढविण्यासंदर्भात आता राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आहे. सध्या खरेदी केंद्र सुरु होऊन सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण धान विकणे अशक्य होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दीष्ट

राज्यातील धान उत्पादक क्षेत्राचा विचार करिता 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत धान खरेदीसाठी राज्यभरातून 1 लाख 33 हजार 443 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यातून धान खरेदीसाठी 11 लाख क्विंटलच्या धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील उत्पादकतेच्या हेतूने ही खरेदी केंद्र उभारली आहेत. चंद्रपूर मध्ये 4 हजार 143 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून धान खरेदीचे उद्दिष्ट 39 हजार 921 क्विंटल आहे. महाराष्ट्र राज्याची धान उत्पादकता 1. 86 एलएमटी असून केंद्र शासनाने केवळ 1. 50 एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, तोडगा निघेल

धान खरेदी केंद्रावर ठरवून देण्यात आलेला कोटा हा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे कोट्यामध्ये वाढ मिळावी या अनुशंगाने चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल व धान खरेदी बाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.