Chandrapur : धान खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम, पालकमंत्र्यांच्या पत्राने मिटणार का शेतकऱ्यांचा प्रश्न!

राज्यात धान खरेदीच्या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार खरेदीही सुरु झाली असून आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. केंद्राने ठरवून दिलेला कोटा हा मर्यादित असून तो वाढविण्यासंदर्भात आता राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आहे.

Chandrapur : धान खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम, पालकमंत्र्यांच्या पत्राने मिटणार का शेतकऱ्यांचा प्रश्न!
धान पीक
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 10:12 AM

चंद्रपूर : राज्यात उशिरा का होईना (Paddy Production) धान खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. धान पिकाची काढणी होऊन महिना उलटला तरी खरेदी केंद्र ही सुरु झाली नव्हती. (State Government) राज्य शासनाच्या रेट्याने हा विषय मार्गी लागला असला तरी धान खरेदीच्या कोट्याचा प्रश्न हा कायम आहे. त्याअनुशंगाने आता (MSP) खरेदी केंद्रावरील कोटा वाढवून देण्याच्या मागणी संदर्भात पालकमंत्री पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता 2 ते 3 दिवसांमध्येदेखील हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची आशा आहे.

अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव

राज्यात धान खरेदीच्या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार खरेदीही सुरु झाली असून आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. केंद्राने ठरवून दिलेला कोटा हा मर्यादित असून तो वाढविण्यासंदर्भात आता राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद आहे. सध्या खरेदी केंद्र सुरु होऊन सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण धान विकणे अशक्य होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दीष्ट

राज्यातील धान उत्पादक क्षेत्राचा विचार करिता 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत धान खरेदीसाठी राज्यभरातून 1 लाख 33 हजार 443 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यातून धान खरेदीसाठी 11 लाख क्विंटलच्या धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील उत्पादकतेच्या हेतूने ही खरेदी केंद्र उभारली आहेत. चंद्रपूर मध्ये 4 हजार 143 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून धान खरेदीचे उद्दिष्ट 39 हजार 921 क्विंटल आहे. महाराष्ट्र राज्याची धान उत्पादकता 1. 86 एलएमटी असून केंद्र शासनाने केवळ 1. 50 एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, तोडगा निघेल

धान खरेदी केंद्रावर ठरवून देण्यात आलेला कोटा हा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे कोट्यामध्ये वाढ मिळावी या अनुशंगाने चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल व धान खरेदी बाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.