AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा: हंगाम सुरु होऊनही द्राक्ष निर्यातीला कशाचा अडसर? नैसर्गिक संकटानंतरही समस्या कायम

द्राक्ष बागा जोमात असताना निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याची अनुभती फळबागायतदार शेतकऱ्यांना आली होती. अवकाळी, अतिवृष्टी, गारपिट आणि हे कमी म्हणून की काय अंतिम टप्प्यात वाढलेली थंडी. अशा एक ना अनेक संकटावर मात करीत अखेर शेतकऱ्यांनी द्राक्ष पदरात तर पाडून घेतले पण त्यानंतरही संकटाने काही पाठ सोडलेली नाही. आता सांगली आणि नाशिक या मुख्य आगारातून द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली आहे पण संथ गतीने.

दुष्काळात तेरावा: हंगाम सुरु होऊनही द्राक्ष निर्यातीला कशाचा अडसर? नैसर्गिक संकटानंतरही समस्या कायम
वातावरणातील बदलामुळे आता खराब द्राक्षाचे बेदाण्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 16, 2022 | 3:04 PM
Share

सांगली : द्राक्ष बागा जोमात असताना (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याची अनुभती फळबागायतदार शेतकऱ्यांना आली होती. अवकाळी, अतिवृष्टी, गारपिट आणि हे कमी म्हणून की काय अंतिम टप्प्यात वाढलेली थंडी. अशा एक ना अनेक संकटावर मात करीत अखेर शेतकऱ्यांनी (Grape) द्राक्ष पदरात तर पाडून घेतले पण त्यानंतरही संकटाने काही पाठ सोडलेली नाही. आता सांगली आणि नाशिक या मुख्य आगारातून (Grape Export) द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली आहे पण संथ गतीने. यासाठीही मध्यंतरी वातावरणातील बदल हेच कारण ठरत आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्षात गोडवाच उतरत नसल्याने मागणीत घट होऊ लागली आहे. सांगली जिल्ह्यातून युरोपसह अखाती देशात 3 हजार 360 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. वातावरण बदलाने झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या थेट उत्पन्नावर परिणाम करताना दिसत आहे.

द्राक्ष मण्यांची फुगवणही नाही

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सकाळी थंडी आणि धुके पडत आहे. यामुळेच द्राक्षांची अंतिम टप्प्यात वाढ होत नाही शिवाय द्राक्षामध्ये गोडवाच उतरत नाही. एकंदरीत द्राक्षाच्या दर्जावर परिणाम होऊ लागल्याने क्विलिटी चेकींगमध्ये ही द्राक्ष निर्यातीसाठी योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. शिवाय द्राक्ष मण्यांची अपेक्षित फुगवणही होत नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली असली तरी दरवर्षीसारखी वर्दळ आणि उत्साह नसल्याचे चित्र आहे.

3 हजार टन द्राक्षांची निर्यात

सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना विशेषत: युरोप आणि आखाती देशासह रशिया मलेशिया या देशातून मागणी असते. यंदा निर्यातच सुरु होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते पण अखेर याला सुरवात झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात झाली असली तो वेग आलेला नाही. आतापर्यंत युरोपीय देशांमध्ये 869 टन, आखाती देशासह इतर देशांमध्ये 2 हजार 490 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही निर्यात कमी असून असेच वातावरण राहिले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यंदा सर्वकाही निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले आहे.

कृषी विभाग मात्र आशादायी

निर्यातीमध्ये घट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. पण आगामी काळात वातावरण निवाळल्यावर द्राक्ष निर्यातीला गती येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे. द्राक्षाला मागणी आहे पण मुळात मालच त्या प्रतीचा नसल्याने अडसर निर्माण होत आहे. यंदा रशियातून चांगली मागणी असून काही दिवसांनी निर्यात वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!

‘जलयुक्त’योजनेतील पाणी परळीतच ‘मुरलं’ अन् चौकशीत ते बाहेरही ‘आलं’, कृषी सहसंचालकानीच दिले वसुलीचे आदेश

अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर ‘वन’, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?