AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, शेतकऱ्यांवर कोणतं संकट ?

आधीच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना मोठा दणका बसलेला असतांना आता पुन्हा शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, शेतकऱ्यांवर कोणतं संकट ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 13, 2023 | 3:05 PM
Share

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसमोर ( Farmer News ) येईल संकटाची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. नुकतेच ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास ही निघून गेल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार आणि भाजीपाला उत्पादक यांची अधिक अडचण निर्माण झाली आहे.

आजपासून म्हणजे 13 मार्च पासून 17 मार्चपर्यन्त पाच दिवस राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे. यामध्ये तुरळक पाऊस, विजा आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेवटचे दोन दिवस अधिक तीव्रतेची असण्याची शक्यता आहे.

जवळपास हा संपूर्ण आठवडाच शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेचा असणार आहे. अरबी आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वादळामुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. इतर राज्यातही याचा फटका बसण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

खरंतर शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो. पाऊस चांगला झाला की दुष्काळी भागात सुद्धा पीक शेतकरी घेऊ शकतो. तशी स्थिती उन्हाळ्यात नसते. त्यामुळे पावसाळा आणि उन्हाळ्याचे आठ महीने शेतकऱ्यांसाठी महत्वाची असतात.

मात्र, पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने उघडीप घेतली आणि नंतर पावसाने केलेल्या मुक्कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता हाती आलेले पीक शेतकऱ्यांना तारणार असल्याचे बोलले जात असतांना पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, गहू, कांदे आणि हरभरा अशी पीक भुईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा संकट आल्यास आणखी मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

अवकाळी पावसात मोठे नुकसान झाले होते, मात्र काही प्रमानात पीक हातात आले होते. पण जर पुन्हा अवकाळी पाऊस आला तर मोठा फटका बसू शकतो अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली असून आता पुन्हा नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

त्यामुळे हा संपूर्ण आठवडा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा असून पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र जर पाऊस आल्यास आर्थिक फटका बसणार आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.