AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : मोदी सरकार संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आणण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी आणि विनाहमी कर्ज देण्याचं सरकारचं नियोजन आहे, ज्यामुळे मुद्दल रक्कमेचं व्याज वाढून शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, छोटे शेतकरी आणि मध्यमवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कृषी मंत्रालय आणि नीत आयोग काम करत आहेत. यामध्ये तीन लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी […]

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकार संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आणण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी आणि विनाहमी कर्ज देण्याचं सरकारचं नियोजन आहे, ज्यामुळे मुद्दल रक्कमेचं व्याज वाढून शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, छोटे शेतकरी आणि मध्यमवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कृषी मंत्रालय आणि नीत आयोग काम करत आहेत. यामध्ये तीन लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्जही मिळण्याची शक्यता आहे.

वेळेवर कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना सध्या बिनव्याजी कर्ज दिलं जातं. बिनव्याजी कर्ज देण्यास बँका नेहमीच टाळाटाळ करतात. पण व्याजाच्या रकमेची जबाबदारी सरकारने घेतल्यास बँका यासाठी तयार होऊ शकतात. यावर्षी सादर होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये ही घोषणा होऊ शकते.

सरकारच्या आणखी एका महत्त्वाच्या प्रस्तावामध्ये विनाहमी कर्जाचाही समावेश आहे. दोन ते तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज या योजनेंतर्गत मिळू शकतं. क्रेडिट गॅरंटीसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिल्याशिवाय बँका विनाहमी कर्जासाठी तयार होणार नसल्याचं बोललं जातंय.

मोदी सरकार आपलं अंतरिम बजेट 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारीला होत आहे. 13 फेब्रुवारीला हे अधिवेशन संपणार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारकडून अंतरिम बजेट सादर केलं जातं आणि निवडणुकीनंतर नव्या सरकारकडून पूर्ण बजेट सादर केलं जातं.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं ही मोदी सरकारचं महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतल्यास ते चुकवण्यास उशिर होतो आणि कर्जाचा बोजा वाढतच जातो. पण बिनव्याजी कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांवरील बोजा वाढणार नाही. परिणामी घेतलेली मुद्दल रक्कमच भरावी लागेल आणि आर्थिक ताण कमी होईल.

Follow Us
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!