AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या ‘झळा’ शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?

उन्हाळी हंगामातील कांदा आता अखेरच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याची साठवणूक, योग्य निगराणी आणि त्यासाठीचा लागणारा खर्च असे सर्वकाही करुनही यंदा उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. साठवणूक करताच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा सडला होता.

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या 'झळा' शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?
भारत देशातून कांद्याची निर्यात वाढली आहे.
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 4:49 PM
Share

नाशिक : उन्हाळी हंगामातील कांदा आता अखेरच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याची साठवणूक, योग्य निगराणी आणि त्यासाठीचा लागणारा खर्च असे सर्वकाही करुनही यंदा उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. साठवणूक करताच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा सडला होता. त्यामुळे नुकसान हे पहिल्यापासूनच झालेले आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंद झाली आहे. संपूर्ण हंगामात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी घेतलेले परीश्रम हे वेगळेच.

आवक अंतिम टप्प्यात असताना वाढले दर

निसर्गाची तर साथ नाहीच पण बाजारपेठेतील बदलते सुत्रही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे. मार्च महिन्यात कांदा काढणीपूर्व झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कांदा डिसेंबरपर्यंत साठवून त्याची टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी विक्री केली. परंतू यामधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. नंतर पुन्हा ऑगस्टपासून वातावरणातील बदलामुळे साठवलेल्या कांदा अधिक प्रमाणात सडला गेला. आता उन्हाळी हंगामातील कांदा संपत असताना दरात सुधारणा होत आहे हे विशेष. त्यामुळे संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरलेला आहे.

सरकारने योग्य धोरण ठरवले तरच फायद्याचे..

कांदा दराबाबत कायम अनिश्चितता राहिलेली आहे. त्यामुळे कांदा हे नगदी पीक असले तरी तेवढेच बेभरवशाचे. त्यामुळे किमान निर्यातीबाबत तरी सरकारने धोरण ठरवणे गरजेचे आहे. वाहतूकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपेक्षित निर्यातही होत नाही. कधी वाहतूकीतील अडचण तर कधी दरात होणारे बदल यामुळे कायम नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कंटेनरची कमी उपलब्धता, इंधन दरवाढ अडचणीची ठरली. त्यातच निर्यात धोरण स्थिर नसल्याने मागणीचा फटका बसतो आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत राहिले. शेतकरी व व्यापारी हंगाम अडचणींचा ठरला आहे.

आठ महिने साठणूक तरीही निराशाच

उन्हाळी हंगामातील कांद्याची आठ महिने साठवणूकच नाही तर योग्य काळजी घेऊनही शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. वातावरणातील बदल, अवकाळीमुळे कांद्याची सड, झालेले नुकसान हे पाहता उन्हाळी कांद्यातून उत्पन्नापेक्षा नुकसानच अधिकचे झाले आहे. आता साठणूकीतला कांदा अंतिम टप्प्यात आहे. किमान सरकारने धोरणे बदलून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल

कृषी आयुक्तांची एक सुचना अन् हळद लागवडीचे गुपीत आले बाहेर, उत्पादन वाढीबाबत काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.