AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या ‘झळा’ शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?

उन्हाळी हंगामातील कांदा आता अखेरच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याची साठवणूक, योग्य निगराणी आणि त्यासाठीचा लागणारा खर्च असे सर्वकाही करुनही यंदा उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. साठवणूक करताच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा सडला होता.

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या 'झळा' शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?
भारत देशातून कांद्याची निर्यात वाढली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 05, 2022 | 4:49 PM
Share

नाशिक : उन्हाळी हंगामातील कांदा आता अखेरच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याची साठवणूक, योग्य निगराणी आणि त्यासाठीचा लागणारा खर्च असे सर्वकाही करुनही यंदा उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. साठवणूक करताच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा सडला होता. त्यामुळे नुकसान हे पहिल्यापासूनच झालेले आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंद झाली आहे. संपूर्ण हंगामात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी घेतलेले परीश्रम हे वेगळेच.

आवक अंतिम टप्प्यात असताना वाढले दर

निसर्गाची तर साथ नाहीच पण बाजारपेठेतील बदलते सुत्रही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे. मार्च महिन्यात कांदा काढणीपूर्व झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कांदा डिसेंबरपर्यंत साठवून त्याची टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी विक्री केली. परंतू यामधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. नंतर पुन्हा ऑगस्टपासून वातावरणातील बदलामुळे साठवलेल्या कांदा अधिक प्रमाणात सडला गेला. आता उन्हाळी हंगामातील कांदा संपत असताना दरात सुधारणा होत आहे हे विशेष. त्यामुळे संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरलेला आहे.

सरकारने योग्य धोरण ठरवले तरच फायद्याचे..

कांदा दराबाबत कायम अनिश्चितता राहिलेली आहे. त्यामुळे कांदा हे नगदी पीक असले तरी तेवढेच बेभरवशाचे. त्यामुळे किमान निर्यातीबाबत तरी सरकारने धोरण ठरवणे गरजेचे आहे. वाहतूकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपेक्षित निर्यातही होत नाही. कधी वाहतूकीतील अडचण तर कधी दरात होणारे बदल यामुळे कायम नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कंटेनरची कमी उपलब्धता, इंधन दरवाढ अडचणीची ठरली. त्यातच निर्यात धोरण स्थिर नसल्याने मागणीचा फटका बसतो आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत राहिले. शेतकरी व व्यापारी हंगाम अडचणींचा ठरला आहे.

आठ महिने साठणूक तरीही निराशाच

उन्हाळी हंगामातील कांद्याची आठ महिने साठवणूकच नाही तर योग्य काळजी घेऊनही शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. वातावरणातील बदल, अवकाळीमुळे कांद्याची सड, झालेले नुकसान हे पाहता उन्हाळी कांद्यातून उत्पन्नापेक्षा नुकसानच अधिकचे झाले आहे. आता साठणूकीतला कांदा अंतिम टप्प्यात आहे. किमान सरकारने धोरणे बदलून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल

कृषी आयुक्तांची एक सुचना अन् हळद लागवडीचे गुपीत आले बाहेर, उत्पादन वाढीबाबत काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.