AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात

अवकाळी आणि बरेच काही होऊन पिकांचे, फळबागांचे नुकसान सुरुच होते. मात्र, शेतकरी हा मदतीच्या प्रतिक्षेतच होता. याच दरम्यान, महाबळेश्वर येथे नुकसानभरापईचे काम नाम फांऊडेशने हाती घेतले आहे. या परिसरातील 105 गावातील शेतकऱ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा 'हा' मदतीचा हात
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 2:56 PM
Share

सातारा : शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याला जोडूनच मदतीच्या घोषणा आणि आश्वासने येतातच. मग त्याची पूर्तता होऊ अथवा न होऊ. असाच प्रकार खरीप हंगामात झाला होता. (Heavy rains) अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच शिवाय (damage to agricultural land) शेत जमिनीही खरडून गेल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी झाल्या होत्या. त्यानुसार मदतीचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर अवकाळी आणि बरेच काही होऊन पिकांचे, फळबागांचे नुकसान सुरुच होते. मात्र, शेतकरी हा मदतीच्या प्रतिक्षेतच होता. याच दरम्यान, महाबळेश्वर येथे नुकसानभरापईचे काम (naam foundation) नाम फांऊडेशने हाती घेतले आहे. या परिसरातील 105 गावातील शेतकऱ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.

नेमके काय होणार काम?

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील माती, दगड हे शेतजमिनीवर साचून राहिलेली होती. त्यामुळे शेत जमिन ही नापिक झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान टाळण्यासाठी आता नाम फांऊडेशने भूमिका घेतली आहे. 2 पोकलॅंड आणि 6 जेसीबीच्या माध्यमातून हे शेत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे आता शेतजमिन ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन हंगामापासून होणारे नुकसान टळणार आहे. सुरवातीला नदी-ओढ्यांचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पाऊस झाला तरी शेतजमिनीचे अधिकचे नुकसान न होण्यासाठी आगोदर हे काम हाती घेण्यात आले आहे.

पीक नुकसानभरपाई मिळाली शेतजमिनीचे काय?

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम अदा केली होती. पैकी 25 टक्के नुकसानभरपाई देणे अद्यापही बाकी आहे. एवढेच नाही खरडून गेलेल्या जमिन दुरुस्तीसाठीही निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, अद्यापही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे.

नाम फांऊडेशनच्या मदतीचे असे आहे स्वरुप

आतापर्यंत नाम फांऊडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कायम या फांऊडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. आता महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये शेतजमिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी झाला असून प्रथम जलसाठ्यांचे दुरुस्ती आणि नंतर शेतजमिनीची बांधणी केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : अखेर शेतकऱ्यांनी घेतला निर्णय, दोन दिवसांमध्ये सोयाबीन-कापसामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र

तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ, जालन्यातील उत्पादकता नागपूरच्या बरोबरीने, कशामुळे झाली ही क्रांती?

सर्जा-राजा : ‘सर्जा’मुळे घरात समृध्दी, शेतकऱ्याने जाणीव ठेऊन केला दशक्रिया विधी

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...