AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात

अवकाळी आणि बरेच काही होऊन पिकांचे, फळबागांचे नुकसान सुरुच होते. मात्र, शेतकरी हा मदतीच्या प्रतिक्षेतच होता. याच दरम्यान, महाबळेश्वर येथे नुकसानभरापईचे काम नाम फांऊडेशने हाती घेतले आहे. या परिसरातील 105 गावातील शेतकऱ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा 'हा' मदतीचा हात
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 05, 2022 | 2:56 PM
Share

सातारा : शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याला जोडूनच मदतीच्या घोषणा आणि आश्वासने येतातच. मग त्याची पूर्तता होऊ अथवा न होऊ. असाच प्रकार खरीप हंगामात झाला होता. (Heavy rains) अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच शिवाय (damage to agricultural land) शेत जमिनीही खरडून गेल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी झाल्या होत्या. त्यानुसार मदतीचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर अवकाळी आणि बरेच काही होऊन पिकांचे, फळबागांचे नुकसान सुरुच होते. मात्र, शेतकरी हा मदतीच्या प्रतिक्षेतच होता. याच दरम्यान, महाबळेश्वर येथे नुकसानभरापईचे काम (naam foundation) नाम फांऊडेशने हाती घेतले आहे. या परिसरातील 105 गावातील शेतकऱ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.

नेमके काय होणार काम?

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील माती, दगड हे शेतजमिनीवर साचून राहिलेली होती. त्यामुळे शेत जमिन ही नापिक झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान टाळण्यासाठी आता नाम फांऊडेशने भूमिका घेतली आहे. 2 पोकलॅंड आणि 6 जेसीबीच्या माध्यमातून हे शेत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे आता शेतजमिन ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन हंगामापासून होणारे नुकसान टळणार आहे. सुरवातीला नदी-ओढ्यांचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पाऊस झाला तरी शेतजमिनीचे अधिकचे नुकसान न होण्यासाठी आगोदर हे काम हाती घेण्यात आले आहे.

पीक नुकसानभरपाई मिळाली शेतजमिनीचे काय?

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम अदा केली होती. पैकी 25 टक्के नुकसानभरपाई देणे अद्यापही बाकी आहे. एवढेच नाही खरडून गेलेल्या जमिन दुरुस्तीसाठीही निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, अद्यापही ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे.

नाम फांऊडेशनच्या मदतीचे असे आहे स्वरुप

आतापर्यंत नाम फांऊडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कायम या फांऊडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. आता महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये शेतजमिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी झाला असून प्रथम जलसाठ्यांचे दुरुस्ती आणि नंतर शेतजमिनीची बांधणी केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : अखेर शेतकऱ्यांनी घेतला निर्णय, दोन दिवसांमध्ये सोयाबीन-कापसामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र

तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ, जालन्यातील उत्पादकता नागपूरच्या बरोबरीने, कशामुळे झाली ही क्रांती?

सर्जा-राजा : ‘सर्जा’मुळे घरात समृध्दी, शेतकऱ्याने जाणीव ठेऊन केला दशक्रिया विधी

Follow Us
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.