AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान

फळ काढणीच्या दरम्यान फळगळतीचा धोका असतो. असे असतानाही ना पंचनामे केले जात आहेत ना सर्व्हेक्षण त्यामुळे अमरावतीसह राज्यातील फळबागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. (Vidarbha) बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा लागवड भागात ही फळगळती होत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 6:10 PM
Share

अमरावती : खरीप- रब्बी हंगामातील पीकांचे नैसर्गिक नुकसान झाले तर त्याचे विम्यापोटी नुकसानभरपाई मिळते. मात्र, संत्रा फळाच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. (fruit leakage ) कारण ऐन फळ काढणीच्या दरम्यान फळगळतीचा धोका असतो. असे असतानाही ना पंचनामे केले जात आहेत ना सर्व्हेक्षण त्यामुळे अमरावतीसह राज्यातील फळबागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. (Vidarbha) बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा लागवड भागात ही फळगळती होत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षण व पंचनाम्याची मागणी केली आहे.

प्रामुख्याने संत्र्याची लागवड ही विदर्भात केली जाते. एकाच वाणातील अवलंबिता या कारणामुळे उत्पादकतेच्या बाबतीत नागपुरी संत्रा देशातील इतर संत्रा वाणाच्या तुलनेत पिछाडला आहे. यातच कीड-रोगांचा प्रादुर्भाव बागांमध्ये वाढीस लागल्याने अनेक शेतकऱ्यांना बागा काढून टाकण्याची वेळ आली. तर ऐन फळकाढणीच्या प्रसंगीच पावसाची संततधार आणि वातादरणात बदल यामुळे बुरशीजन्यरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे फळगळतीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी बागायतदार हे करीत आहेत.

दरवर्षीचे नुकसान

दरवर्षी आंबिया बहरातील फळांची गळ ही ठरलेलीच आहेय त्यामुळे ऐन उत्पादन पदरी पडत असतानाच बागायत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबिया बहरातील फळांची गळ झाली. या वर्षी देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर सर्व्हेक्षण, पंचनामे व भरपाईची मागणी झाली. मात्र, शासनाकडूनच याकडे दुर्लक्ष होत आहे.

आंबिया बहर म्हणजे नेमके काय?

आंबिया बहर हे नोव्हेंदर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.

सर्वाधिक विम्याचे कवच द्रात्र फळपिकाला

आंबिया बहरातील सर्वाधिक विमा संरक्षित रक्कम ही द्राक्षासाठी देण्यात आली आहे. ही रक्कम 3 लाख 20 हजार असून या फळपिक उत्पादकाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे द्राक्ष- 15 ऑक्टोंबर, मोसंबी 31 ऑक्टोंबर, केळी 31 ऑक्टोंबर, पपई 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, काजू 30 नोव्हेंबर, कोकण आंबा 30 नोव्हेंबर, स्ट्रॅाबेरी 14 नोव्हेंबर अशी मुदत ठरवून देण्यात आली आहे. (Farmers suffer financial loss due to lack of compensation for fruit leakage )

संबंधित बातम्या :

ऊसाची योग्य लागवड देईल भरघोस उत्पादन, शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी घ्यावी

‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर

(MSP) आणि (APMC) म्हणजे नेमके काय? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....