AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 36 हजारांची पेन्शन, फक्त करा ‘हे’ काम

सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना (पीएम-केएमवाय) पीएम-किसानशी जोडली आहे. याचा फायदा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

आनंदाची बातमी! प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 36 हजारांची पेन्शन, फक्त करा 'हे' काम
Farmer
| Updated on: Aug 06, 2025 | 3:10 PM
Share

देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता आणखी एका योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना (पीएम-केएमवाय) पीएम-किसानशी जोडली आहे. याचा फायदा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे करावी लागणार नाहीत.

पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत, शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर म्हणजे वृद्धापकाळात दरमहा 3000 रुपये, म्हणजेच वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. पीएम-किसानच्या वार्षिक 6000 रुपयांच्या निधीतून मासिक योगदान कापले जाणार आहे.

वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन

पीएम किसान मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्षे असावे. या योजनेसाठी एकदा नोंदणी केल्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपयांचे पेन्शन मिळेल. म्हणजेच वर्षभरात 36000 रुपये मिळतील. ही पेन्शन उर्वरित आयुष्यासाठी मिळणार आहे. पेन्शनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक विशेष पेन्शन आयडी नंबर मिळेल जो तुम्हाला भविष्यातील कामासाठी उपयोगी ठरेल.

या योजनेसाठी नोंदणी कशी करायची?

पीएम किसान मानधन पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जावे लागेल. केंद्रात जाताना आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत न्या. CSC ऑपरेटर तुमच्या कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाइन फॉर्म भरेल. तसेच ऑटो-डेबिट फॉर्म देखील भरला जाईल. यामुळे या योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट बँक खात्यातून कापले जाईल. तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर ही रक्कम सहाय्याने आपोआप कापली जाईल.

पीएम किसानच्या पैशातून पेन्शन मिळणार

महत्वाची बाब म्हणजे या पेन्शन योजनेत शेतकऱ्यांच्या खिशातून एक रुपयाही घेतला जात नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच वर्षाला 2400 रुपये थेट पंतप्रधान किसान योजनेच्या रकमेतून कापले जातील. यातून उरलेले 3600 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळू शकतो.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा