AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 27, 2021 | 4:07 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यालाही मोठा आधार मिळणार आहे. कृषी सेवा केंद्रांनी कृत्रिम टंचाई भासवून लूट सुरु केली होती त्याला आता आळा बसणार आहे.

सध्या देशात रब्बी पिकांची पेरणी शिगेला पोहोचली असून, खताची कमतरता असल्याची तक्रार विविध राज्यांतील शेतकरी करत आहेत. खते मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हिंदू बिझनेस लाइनला सांगितले की, पश्चिम किनारपट्टीवरील बंदरात 10 लाख टन आयात केलेले खत येईल तर 6 लाख टन पूर्व किनारपट्टीवर येईल. आयात केलेले खत देशात पोहोचून देशांतर्गत बाजारपेठेच्या पुरवठ्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेडला देण्यात येणार आहे.

उत्पादनापेक्षा मागणी अधिक,

भारतात दरवर्षी 25 लाख टन युरियाचे उत्पादन होते, परंतु देशांतर्गत युरियाची मागणी उत्पादनापेक्षा जास्त आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी 80 ते 90 लाख टन युरिया आयात करावा लागतो. सरकार वेळोवेळी गरज, मागणी, पुरवठा आणि किंमतींचे मूल्यांकन करून युरिया आयात करण्यास परवानगी देते. यावर्षी एप्रिल-जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून सुमारे 10 लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन चीनने आता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारताला रशिया आणि इजिप्तमधून युरिया आयात करावा लागत आहे.

युरियाचा होतोय अधिक वापर

देशातील एकूण खतांच्या वापरापैकी 55 टक्के युरिया आहे. इतर खतांच्या किंमती ह्या अधिकच्या आहेत शिवाय त्यामुळे पिकांची वाढ होत नाही या कारणामुळे शेतकरी युरिया वापरणेच पसंत करतात. युरियाच्या 45 किलोच्या बॅगची कमाल किरकोळ बाजारात 242 असून 50 किलो बॅगची किंमत 268 रुपये आहे तर डीएपीच्या 50 किलो बॅगची किंमत 1200 रुपये आहे.

मागणी आणि झालेला पुरवठा

खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल-सप्टेंबर दरम्यान खरीप पेरणी हंगामासाठी युरियाची आवश्यकता 17 लाख 75 हजार टन एवढी होती तर उपलब्धता 20 लाख 82 हजार टन आणि 16 लाख 56 हजार टन होती. सध्याच्या रब्बी पेरणी हंगामाची मागणी अंदाजे 17 लाख 9 हजार टन आहे, तर २४ नोव्हेंबर रोजी उपलब्धता 5 लाख 44 हजार टन एवढी होती. याच रब्बी हंगामात 1 ऑक्टोबरपासून 4 लाख 41 हजार टन युरियाची विक्री झाली आहे. अशा परिस्थितीत आता या हंगामासाठी शेतकऱ्यांना केवळ 80 लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ ‘या’ गोष्टींचे पालन करावे, शेतकऱ्यांना कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?

तुम्हाला माहिती आहे का झाडे अचानक का सुकतात? हवामान बदलाचा परिणाम की अणखीन काही…!

विज तोडणीवरुन मनसे आक्रमक, तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधूनच..!

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?