AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला

निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आंबा उत्पादकांचे झाले आहे. असे असताना फळबाग लागवडीमध्ये यंदाही आंब्यानेच आघाडी घेतली आहे. केवळ कोकण भागातच नाही तर आता राज्यभर हापूस आंब्याच्या कलमांना मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रोपवाटिकांना योग्य असे नियोजन करावे लागणार आहे.

Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला
निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा फळपिकाचे नुकसान होऊन देखील लागवडीमध्ये वाढ होत आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 18, 2022 | 10:57 AM
Share

रत्नागिरी : निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा (Orchard) फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे (Mango Production) आंबा उत्पादकांचे झाले आहे. असे असताना फळबाग लागवडीमध्ये यंदाही आंब्यानेच आघाडी घेतली आहे. केवळ (Kokan) कोकण भागातच नाही तर आता राज्यभर हापूस आंब्याच्या कलमांना मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रोपवाटिकांना योग्य असे नियोजन करावे लागणार आहे. या भागात हापूससह विविध प्रकारच्या आंबा कलमाची ‘मनरेगा’ च्या माध्यमातून लागवड केली जाते. गतवर्षी मागणीनुसार पुरवठा झाला नव्हता त्यामुळे यंदाचे रोपे कमी पडू नये यासाठी रोपवाटिकाधारकांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

रोप तयार करण्याबाबत रोपवाटिकांना सूचना

निसर्गाचा लहरीपणा असला तरी दिवसेंदिवस फळबागाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शेतकरी शाश्वत उत्पादनावर भर देत आहे. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान हे होतेच. असे असतानाही यंदा आंबा आणि काजू लागवडीच्या क्षेत्राच वाढ होणार आहे. आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात रोपांची मागणी होते. त्यानुसार रत्नागिरीतील खासगी आणि शासकीय रोपवाटिकांनी दर्जेदार कलम तयार करण्यावर भर देण्याच्या सूचना फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिल्या आहेत.

कृषी विद्यापीठाचीही महत्वाची भूमिका

आंबा कलम उपलब्ध करुन देण्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाचीही महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाने अपेक्षित रोपांची मागणीची माहिती ही रोपवाटिकाधारकांना देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने चार वर्षापूर्वी तयार केलेल्या रोपांना म्हणावा तसा उठाव झाला नव्हता. त्यामुळे रोपवाटिकाधारकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांची लेखी यादी दिली तर ते अधिक सोईस्कर होईल अशी मागणी रोपवाटिकाधारक करीत आहेत.

रोपवाटिकांधारकांच्या काय आहेत मागण्या?

ज्याप्रमाणे बदलत्या वातावरणामुळे फळबागांचे नुकसान होते अगदी त्याचप्रमाणे रोपवाटिकांचे. त्यामुळे काजू बीला हमीभाव देण्यात यावा, उत्पादन खर्च प्रती किलो 40-50 मिळावा, परदेशातील काजू कमी किंमतीमध्ये उपलब्ध करुन द्यावा, इनपूट ड्यूटी वाढवून द्यावी एवढेच नाही तर प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी रोपवाटिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Exhibition: दीड टन वजनाच्या ‘गजेंद्र’ रेड्याचा रुबाबच वेगळा,कोट्यावधीची बोली अन् मालकाची ना..

Onion Market: बुडत्याला काडीचा आधार, ‘नाफेड’ ची खरेदी अन् शेतकऱ्यांना फायदा, कांद्याच्या मुख्य मार्केटमध्ये चाललयं काय?

Weather Update: पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता! विदर्भ वगळता मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Follow Us
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार