AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे.

राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
अवकाळी पाऊस (फाईल फोटो) Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 07, 2023 | 11:50 AM
Share

जळगाव : जळगाव (jalgaon) जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला (rain update) सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रावेर यावल भुसावळ तालुक्यात केळी, गहू, मका पिकाला मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीके ही आडवी झाली आहेत. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा मात्र हवालदार झाला आहे. आज दिवसभरात अनेक जिल्ह्यात (maharashtra heavy rain update) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गहु, हरभरा पिकांसह संत्रा बागेचे अतोनात नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. दरम्यान अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाच नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे, यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत असून, पिके जमीनदोस्त होत आहेत. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील आत्माराम कापरे यांच्या अडीच एकरातील ज्वारीचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र रब्बीवरही अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचे संकट घोंगावत आहे. रात्री झालेल्या वाऱ्यामुळे गव्हाचे पीक जमीन दोस्त झाले आहे. त्याच बरोबर आंब्या सह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक