AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : ‘एफसीआय’च्या जाचक अटी, शेतकऱ्यांची पसंती ‘नाफेड’ला, अकोल्यात नेमकं काय घडलं?

यंदा प्रथमच अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये खाद्य निगम अर्थात एफसीआय ने शेतीमाल खरेदीला सुरवात केली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून हरभरा खरेदीला सुरवातही झाली होती. शिवाय या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्रे ही उभारण्यात आले होते. पण खरेदी करताना लावण्यात आलेल्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी मेटाकूटीला आला होता.

Akola : 'एफसीआय'च्या जाचक अटी, शेतकऱ्यांची पसंती 'नाफेड'ला, अकोल्यात नेमकं काय घडलं?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
| Updated on: May 01, 2022 | 1:10 PM
Share

अकोला : केंद्र सरकारच्या माध्यमातून किमान किंमतीने ( Agricultural Commodities) शेतीमालाची खरेदी केली जाते. यासाठी (NAFED) ‘नाफेड’ संस्थेचा तर पुढाकार आहेच पण यंदा प्रथमच ‘एफसीआय’ म्हणजेच (FCI) भारतीय खाद्य निगमनेही सहभाग घेतला होता. पण एफसीआयच्या जाचक अटींमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने अखेर हे खरेदी केंद्रातून एफसीआयने माघार घेतली आहे. तर पुन्हा खरेदी केंद्राची सूत्रे ही नाफेडकडेच आली आहेत. खासगी संस्थांच्या मनमानी कारभारामुळे मात्र, शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळेच पुन्हा शेतीमाल खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून केली जाणार आहे.

‘एफसीआय’चे निकष शेतकऱ्यांसाठी जाचक

यंदा प्रथमच अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये खाद्य निगम अर्थात एफसीआय ने शेतीमाल खरेदीला सुरवात केली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून हरभरा खरेदीला सुरवातही झाली होती. शिवाय या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्रे ही उभारण्यात आले होते. पण खरेदी करताना लावण्यात आलेल्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी मेटाकूटीला आला होता. खरेदीपेक्षा शेतकऱ्यांनी आणलेला माल परत जाण्याचीच धास्ती शेतकऱ्यांना होती. त्यामुळेच शेतकऱ्यांचा ओघ हा कमी होत होता. अखेर या संस्थेनेच यातून माघार घेतली आहे.

खरेदीचा वेग मंदावल्याने वरिष्ठांनी घेतला निर्णय

सध्या हरभऱ्याची आवक सुरु आहे. शिवाय उत्पादन वाढले असून खुल्या बाजारपेठेपेक्षा अधिकचा दर हा खरेदी केंद्रावर आहे. असे असतानाही शेतकरी एफसीआयच्या खरेदी केंद्राकडे फिरकत नाहीत. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शास आली. त्यामुळे खरेदीचा वेग मंदावला आणि या संस्थेवरील दबाव हा वाढतच गेला. त्यामुळे अखेर एफसीआयने यामधून माघार घेतली आहे.

आता वाशिममध्येही नाफेडच करणार खरेदी

अकोला पाठोपाठ आता वाशिम जिल्ह्यातूनही एफसीआय माघार घेणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्येही आता हरभऱ्याची खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाफेडच्या माध्यमातूनच शेतीमालाची खरेदी होत आहे. त्यामुळे या संस्थेची पध्दत आणि नियमावली ही शेतकऱ्यांना माहिती झाली आहे. पण एफसीआयची नवीन प्रणाली शेतकऱ्यांना रुचलीच नसल्याने त्यांना महिनाभरात आवरते घ्यावेल लागले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.