AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhule : या जिल्ह्यात शेतकर्‍यांना 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप

शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने बँकेने खरीप पीककर्ज वाटप केलेले आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकेने सरासरी 79 हजार 350 पात्र शेतकऱ्यांना 304 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देखील दिला आहे.

Dhule : या जिल्ह्यात शेतकर्‍यांना 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप
DHULE NANDURBAR FARMER NEWSImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 23, 2023 | 2:17 PM
Share

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील धुळे नंदुरबार (Nandurbar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात (In distribution of crop loans to farmers) आघाडी घेतली आहे. बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी विक्रमी 298 कोटी रुपयांचा पीक कर्ज वाटप केला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 27 हजार 834 सभासद शेतकऱ्यांना सरासरी 298 कोटी 35 लाखांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं असून यंदा उद्दिष्टापेक्षा तब्बल 106 टक्के अधिक पीक कर्ज वाटप केल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदंमबांडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने बँकेने खरीप पीककर्ज वाटप केलेले आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकेने सरासरी 79 हजार 350 पात्र शेतकऱ्यांना 304 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देखील दिला आहे.

या जिल्ह्यात शेतकर्‍यांना 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप…

निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षात खरीप हंगामातील पिकासोबत रब्बी हंगामातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकऱ्याचा लागलेला खर्चही निघालेला नाही, मात्र तरी देखील शेतकरी या सर्व संकटावर मात करत पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या शेती मशागतीला लागला आहे. खते, बी-बियाणे यासाठी शेतकरी आता पीक कर्जाकडे वळाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 318 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

30 हजार 109 शेतकऱ्यांना 318 कोटी रुपयांचे वाटप

बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी 1 लाख 53 हजार शेतकऱ्यांना 1470 कोटी रुपयाचे उद्दिष्ट मिळाले असून, आतापर्यंत 30 हजार 109 शेतकऱ्यांना 318 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात किंवा मागील वर्षात कर्ज घेतली असेल आणि त्यांनी नूतनीकरण जर केले, तर अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून चार टक्के आणि केंद्र शासनाकडून तीन टक्के व्याज शंभर टक्के माफ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा दर हा शून्य टक्के लागतो. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अग्रणी बँकेकडून करण्यात आले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...