AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वीज पडल्याने शेतकऱ्याचा आणि गाईचा मृत्यू

खरिपाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि आता गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वीज पडल्याने शेतकऱ्याचा आणि गाईचा मृत्यू
latur newsImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 19, 2023 | 11:01 AM
Share

लातूर : लातूर (latur) जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर, निलंगा , लातूर ग्रामीण,जळकोट , चाकूर , उदगीर, देवणी आणि अहमदपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मुसळधार पाऊस झाला आहे. पावसात गारांचा मारा झाल्याने पिके उद्धवस्त झाली आहेत. चाकूर तालुक्यातल्या तीर्थवाडीत शेतकरी नागभूषण पाटील (वय-५७) यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर निलंगा तालुक्यातल्या तांबळवाडी मध्ये वीज पडून गाय ठार झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी, हरभरा,गहू पिकांबरोबर आंबा फळांचं मोठं नुकसान लातूर (latur unseasonal rain) जिल्ह्यात झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कैऱ्या तुटून खाली पडल्याने झाडाखाली ढिग साचला आहे .

लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजनी, कासार सिरसी, जाणवळ, हाळी-हंडरगुळी, रामवाडी, खरोळा या गावांसह जळकोट, देवणी तालुक्यातही गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांना घरी खाण्यासाठी लागणारी ज्वारी हातातोंडाशी आली होती. काढणीला आलेली ज्वारी वादळी पाऊस आणि गारपिटीने पूर्णतः आडवी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. हरभरा आणि गहू देखील काढणीला आलेला होता, त्याचेही नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यात केळी आणि ज्वारीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेणापूर तालुक्यातल्या रामवाडी येथे आंबा फळांचे नुकसान झाले आहे . कैऱ्या तुटून खाली पडल्याने झाडाखाली ढिग साचला आहे .

पालेभाज्यांची शेतीचे देखील नुकसान झाले

खरिपाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि आता गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत . गारपीठ झाल्याचे कळल्या नंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लातूर गाठत प्रशासनाची बैठक घेतली. तालुकानिहाय माहिती घेतल्या नंतर गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत . शेतकऱ्यांनीही नुकसानही माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सलग दोन दिवस गारपीट झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालेभाज्यांची शेतीचे देखील नुकसान झाले आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....