AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला

ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन दरवर्षी (Swabhimani Shetkari sanghtna) स्वाभिमानी शेतरकरी संघटनेची ऊस परिषद ही पार पडत असते. यंदा ही ऊस परिषद 19 ऑक्टोंदर रोजी होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले (Raju Shetti) आहे. शिवाय मंत्री समितीने 15 ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याची दिली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही आणि हीच परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'स्वाभिमानी'च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 3:44 PM
Share

कोल्हापूर : ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन दरवर्षी (Swabhimani Shetkari sanghtna) स्वाभिमानी शेतरकरी संघटनेची ऊस परिषद ही पार पडत असते. यंदा ही ऊस परिषद 19 ऑक्टोंदर रोजी होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले (Raju Shetti) आहे. शिवाय मंत्री समितीने 15 ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याची दिली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही आणि हीच परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे 19 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाही हाताळले जाणार आहेत. सध्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी पुर्वीच सरकारने मदत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साखर कारखानदारांना यंदा चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम देणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाटाघाटीमुळेच एफआरपी रक्कम तीन टप्प्यांमध्ये

एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना एकदम मिळणे आवश्यक आहे. तसा नियमही आहे. मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा देण्याचे धोरण ठरवतात हे चुकीचे आहे. यांच्यातील वाटाघाटीमध्ये शेतकऱ्यांचे मात्र, आर्थिक नुकसान होत आहे. 14 दिवसांच्या आतमध्ये एफआऱपी रक्कम देणे बंधनकारक असताना कारखाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा वापरत आहे.

जागर एफआऱपी चा, आराधना शक्तिस्थळांची

एफआरपी रक्कम ही एकरकमी देणे हा नियम आहे. या रकमेचे तील तुकडे केले तर नवरात्रीपासून ‘जागर एफआऱपी चा, आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार आहे. राज्यातील विविध ठिकाणची शक्ति स्थळांची आराधना करुन दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे आंदोलनाची सांगता होणार आहे.

ऊस परिषदेत हे असणार आहेत मुद्दे

यंदाची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे पार पडणार आहे. 19 ऑक्टोंबरला या परिषदेला सुरवात होणार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर प्रश्न असणार आहेतच शिवाय पावसामुळे नुकसान झालेल्य़ा शेतकऱ्यांनाही वेळेत मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे. सरकारने त्वरीत मदत नाही केली तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Information about Raju Shetty, Sugarcane Council of Swabhimani Kisan Sangathan on October 19)

संबंधित बातम्या :

बदलत्या हवामानानुसार संशोधन ही काळाची गरज : कृषीमंत्री भुसे

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 70 टक्के सोयाबीन मातीत.. लातूर, औरंगाबादेत सर्वाधिक नुकसान

उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.