5

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला

ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन दरवर्षी (Swabhimani Shetkari sanghtna) स्वाभिमानी शेतरकरी संघटनेची ऊस परिषद ही पार पडत असते. यंदा ही ऊस परिषद 19 ऑक्टोंदर रोजी होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले (Raju Shetti) आहे. शिवाय मंत्री समितीने 15 ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याची दिली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही आणि हीच परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'स्वाभिमानी'च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 3:44 PM

कोल्हापूर : ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन दरवर्षी (Swabhimani Shetkari sanghtna) स्वाभिमानी शेतरकरी संघटनेची ऊस परिषद ही पार पडत असते. यंदा ही ऊस परिषद 19 ऑक्टोंदर रोजी होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले (Raju Shetti) आहे. शिवाय मंत्री समितीने 15 ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याची दिली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही आणि हीच परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे 19 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाही हाताळले जाणार आहेत. सध्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी पुर्वीच सरकारने मदत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साखर कारखानदारांना यंदा चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम देणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाटाघाटीमुळेच एफआरपी रक्कम तीन टप्प्यांमध्ये

एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना एकदम मिळणे आवश्यक आहे. तसा नियमही आहे. मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा देण्याचे धोरण ठरवतात हे चुकीचे आहे. यांच्यातील वाटाघाटीमध्ये शेतकऱ्यांचे मात्र, आर्थिक नुकसान होत आहे. 14 दिवसांच्या आतमध्ये एफआऱपी रक्कम देणे बंधनकारक असताना कारखाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा वापरत आहे.

जागर एफआऱपी चा, आराधना शक्तिस्थळांची

एफआरपी रक्कम ही एकरकमी देणे हा नियम आहे. या रकमेचे तील तुकडे केले तर नवरात्रीपासून ‘जागर एफआऱपी चा, आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार आहे. राज्यातील विविध ठिकाणची शक्ति स्थळांची आराधना करुन दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे आंदोलनाची सांगता होणार आहे.

ऊस परिषदेत हे असणार आहेत मुद्दे

यंदाची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे पार पडणार आहे. 19 ऑक्टोंबरला या परिषदेला सुरवात होणार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर प्रश्न असणार आहेतच शिवाय पावसामुळे नुकसान झालेल्य़ा शेतकऱ्यांनाही वेळेत मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे. सरकारने त्वरीत मदत नाही केली तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Information about Raju Shetty, Sugarcane Council of Swabhimani Kisan Sangathan on October 19)

संबंधित बातम्या :

बदलत्या हवामानानुसार संशोधन ही काळाची गरज : कृषीमंत्री भुसे

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 70 टक्के सोयाबीन मातीत.. लातूर, औरंगाबादेत सर्वाधिक नुकसान

उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले