AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Positive News: ‘रसायनमुक्त शेती’ केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, जालना कृषी विभागाचा राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम

रासायनिक खत बंद करणे हे लागलीच शक्य नाही. त्यामुळे जालना कृषी विभागाने एक वेगळे धोरण ठरवले आहे. जिल्ह्यात 6 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यानुसार दरवर्षी केवळ 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खत मुक्त शेतीला प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा बदल वाटत नाही शिवाय कृषी विभागाचा उद्देशही साध्य होत आहे. या दरम्यानच्या काळात सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर बदल घडून येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे.

Positive News: 'रसायनमुक्त शेती' केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, जालना कृषी विभागाचा राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम
सेंद्रीय पध्दतीने उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे आता प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 04, 2022 | 10:48 AM
Share

जालना : एकीकडे खरीप हंगामासाठी (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा तुटवडा भासणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे रासायनिक खताचाच वापर कमी करण्याचे धोरण (Agricultural Department) कृषी विभागाकडून राबवले जात आहे. रासायनिक खताची मात्रा अचानक तर बंद करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने त्याअनुशंगाने पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून (Jalna) जालना कृषी विभागाने यंदाच्या वर्षापासून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खताचा वापर करायचा नाही तर शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

शेतकऱ्यांना जैविक खताचा पर्याय

रासायनिक खताच्या वापराचा दुष्परिणाम असला तरी लागलीच याची मात्रा बंद करता येणार नाही. केंद्र सरकारकडून नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आव्हान केले जात आहे. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही, त्यामुळे ही घोषणा केवळ हवेतच विरत आहे. पण जालना कृषी विभागाने केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीला सुरवात केली आहे. एवढेच नाही तर रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खत आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा फायदाही लक्षात येणार असून उत्पादनात अचानक घटही होणार नाही..

सरासरीच्या 10 टक्के क्षेत्रावर हा प्रयोग

रासायनिक खत बंद करणे हे लागलीच शक्य नाही. त्यामुळे जालना कृषी विभागाने एक वेगळे धोरण ठरवले आहे. जिल्ह्यात 6 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यानुसार दरवर्षी केवळ 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खत मुक्त शेतीला प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा बदल वाटत नाही शिवाय कृषी विभागाचा उद्देशही साध्य होत आहे. या दरम्यानच्या काळात सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर बदल घडून येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे. या अनोख्या उपक्रमासाठी जिल्ह्यातील 8 तालुक्यातील क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. रासायनिक खताला पर्याय असणाऱ्या जैविक खतांच्या निर्मितीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

असे निर्माण होणार जेविक खत

जिल्ह्यात 2 हजार 35 युनिट नाडेप तंत्रज्ञाद्वारे 8 हजार 140 मेट्रीक टन खत निर्माण केले जाणार आहे. 702 गांडूळ खत उत्पादन प्रकल्पातून 4 हजार 212 मेट्रीक टन गांडूळ खत तयार केले जाणार आहे. विद्राव्य खताचा वापर वाढवला जाणार आहे. बीजप्रक्रिया करण्याबरोबरच उसाचे पाचट कुजवून 41 हेक्टरवर हा अनोखा प्रयोग उभारला जाणार आहे.

Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...