AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Positive News: ‘रसायनमुक्त शेती’ केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, जालना कृषी विभागाचा राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम

रासायनिक खत बंद करणे हे लागलीच शक्य नाही. त्यामुळे जालना कृषी विभागाने एक वेगळे धोरण ठरवले आहे. जिल्ह्यात 6 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यानुसार दरवर्षी केवळ 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खत मुक्त शेतीला प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा बदल वाटत नाही शिवाय कृषी विभागाचा उद्देशही साध्य होत आहे. या दरम्यानच्या काळात सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर बदल घडून येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे.

Positive News: 'रसायनमुक्त शेती' केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, जालना कृषी विभागाचा राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम
सेंद्रीय पध्दतीने उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे आता प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे.
| Updated on: May 04, 2022 | 10:48 AM
Share

जालना : एकीकडे खरीप हंगामासाठी (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा तुटवडा भासणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे रासायनिक खताचाच वापर कमी करण्याचे धोरण (Agricultural Department) कृषी विभागाकडून राबवले जात आहे. रासायनिक खताची मात्रा अचानक तर बंद करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने त्याअनुशंगाने पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून (Jalna) जालना कृषी विभागाने यंदाच्या वर्षापासून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खताचा वापर करायचा नाही तर शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

शेतकऱ्यांना जैविक खताचा पर्याय

रासायनिक खताच्या वापराचा दुष्परिणाम असला तरी लागलीच याची मात्रा बंद करता येणार नाही. केंद्र सरकारकडून नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आव्हान केले जात आहे. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही, त्यामुळे ही घोषणा केवळ हवेतच विरत आहे. पण जालना कृषी विभागाने केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीला सुरवात केली आहे. एवढेच नाही तर रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खत आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा फायदाही लक्षात येणार असून उत्पादनात अचानक घटही होणार नाही..

सरासरीच्या 10 टक्के क्षेत्रावर हा प्रयोग

रासायनिक खत बंद करणे हे लागलीच शक्य नाही. त्यामुळे जालना कृषी विभागाने एक वेगळे धोरण ठरवले आहे. जिल्ह्यात 6 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यानुसार दरवर्षी केवळ 10 टक्के क्षेत्रावर रासायनिक खत मुक्त शेतीला प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा बदल वाटत नाही शिवाय कृषी विभागाचा उद्देशही साध्य होत आहे. या दरम्यानच्या काळात सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर बदल घडून येईल असा विश्वास कृषी विभागाला आहे. या अनोख्या उपक्रमासाठी जिल्ह्यातील 8 तालुक्यातील क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. रासायनिक खताला पर्याय असणाऱ्या जैविक खतांच्या निर्मितीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

असे निर्माण होणार जेविक खत

जिल्ह्यात 2 हजार 35 युनिट नाडेप तंत्रज्ञाद्वारे 8 हजार 140 मेट्रीक टन खत निर्माण केले जाणार आहे. 702 गांडूळ खत उत्पादन प्रकल्पातून 4 हजार 212 मेट्रीक टन गांडूळ खत तयार केले जाणार आहे. विद्राव्य खताचा वापर वाढवला जाणार आहे. बीजप्रक्रिया करण्याबरोबरच उसाचे पाचट कुजवून 41 हेक्टरवर हा अनोखा प्रयोग उभारला जाणार आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.