AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील 500 झाडांची कत्तल, पोलिस म्हणतात…

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका बागायतदार शेतकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पपई या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील 500 झाडांची कत्तल, पोलिस म्हणतात...
banana Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 02, 2023 | 11:16 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : शहादा (shahada) तालुक्यात अज्ञात व्यक्तींकडून पिके कापून फेकण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी शिवारात उद्धव पाटील या शेतकऱ्याच्या (farmer) केळीच्या बागेत ४०० ते ५०० केळीची झाडे अज्ञात माथेफिरुने कापून फेकल्याने चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अचानक हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त झाला आहे. त्याचबरोबर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची तक्रार तिथल्या शेतकऱ्यांनी (nandurbar news) केली आहे.

वारंवार घटना घडत असल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका बागायतदार शेतकऱ्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पपई या पिकांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती शेतकऱ्यांच्या शेतातील केळी आणि पपईच्या बागांचे नुकसान करत असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उद्धव पाटील यांच्या शेतात लावलेल्या केळीच्या बागेतील ४०० ते ५०० झाडांची कत्तल अज्ञात व्यक्तीने केल्याने त्यांना मोठा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. उद्धव पाटील यांनी शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिके कापून फेकण्याचा घटनांमध्ये वाढ झाली असून संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कोठार कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आतापर्यंत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक

नंदूरबार जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अपात्र लाभार्थीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल यंत्रणेद्वारे खातेदारांची शेतीविषयक माहिती भरण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यात अजूनही २० हजार ९०४ शेतकन्यांनी अद्यापपर्यंत ई-केवायसीची पूर्तता झालेली नाही

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.