AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसा हवाच, पण जगण्याचं नैतिक बळही मागतोय बळीराजा, शासन म्हणून आधी दिलासा आणि मगच पंचनामा

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पंचनामा केला जात आहे. यामध्ये हतबल शेतकऱ्यांना मोठा देण्याचे कामही शासकीय अधिकाऱ्यांना करावे लागत आहे.

पैसा हवाच, पण जगण्याचं नैतिक बळही मागतोय बळीराजा, शासन म्हणून आधी दिलासा आणि मगच पंचनामा
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 17, 2023 | 12:07 PM
Share

नाशिक : संपूर्ण राज्यात कुठे कडक उन्हाचा तडाखा तर कुठे गारांचा पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात राज्यातील सहा ते सात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. सलग सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः नुकसान झाल्याने बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता. नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून काही रक्कम प्राप्त झाली असून त्यानुसार पंचनामे करून तात्काळ मदत दिली जाणार आहे.

त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 208 गावे बाधित तर 25 हजार 985 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पावसाने एकूण 13 हजार 909 हेक्टर वरील शेतीपिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला होता. त्यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते.

10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला होता. कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.

आता तलाठी, मंडल अधिकारी आणि इतर कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून पंचनामे करत आहे. याच दरम्यान शासन म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देणं आणि त्यानंतर पंचनामा करावा लागत आहे. शेतकरी हतबल झाल्याने शासनाला दुहेरी भूमिका बजवावी लागत आहे.

नाशिकच्या सटाणा, दिंडोरी आणि निफाड या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानुसार आज दिंडोरी तालुक्यात आज पंचनामे सुरू झाले असून अहवाल दोन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट मदत जाहीर केली जाणार आहे. खरंतर सलग आठ दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. त्यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असतांना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, लवकरात लवकर कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करेल असा शब्द देतो असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले होते. त्यामुळे प्रत्यक्षात आता पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा लागून आहे.

Follow Us
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...