AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसा हवाच, पण जगण्याचं नैतिक बळही मागतोय बळीराजा, शासन म्हणून आधी दिलासा आणि मगच पंचनामा

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पंचनामा केला जात आहे. यामध्ये हतबल शेतकऱ्यांना मोठा देण्याचे कामही शासकीय अधिकाऱ्यांना करावे लागत आहे.

पैसा हवाच, पण जगण्याचं नैतिक बळही मागतोय बळीराजा, शासन म्हणून आधी दिलासा आणि मगच पंचनामा
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 17, 2023 | 12:07 PM
Share

नाशिक : संपूर्ण राज्यात कुठे कडक उन्हाचा तडाखा तर कुठे गारांचा पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात राज्यातील सहा ते सात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. सलग सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः नुकसान झाल्याने बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता. नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून काही रक्कम प्राप्त झाली असून त्यानुसार पंचनामे करून तात्काळ मदत दिली जाणार आहे.

त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 208 गावे बाधित तर 25 हजार 985 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पावसाने एकूण 13 हजार 909 हेक्टर वरील शेतीपिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला होता. त्यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते.

10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला होता. कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.

आता तलाठी, मंडल अधिकारी आणि इतर कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून पंचनामे करत आहे. याच दरम्यान शासन म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देणं आणि त्यानंतर पंचनामा करावा लागत आहे. शेतकरी हतबल झाल्याने शासनाला दुहेरी भूमिका बजवावी लागत आहे.

नाशिकच्या सटाणा, दिंडोरी आणि निफाड या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानुसार आज दिंडोरी तालुक्यात आज पंचनामे सुरू झाले असून अहवाल दोन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट मदत जाहीर केली जाणार आहे. खरंतर सलग आठ दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. त्यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असतांना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, लवकरात लवकर कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करेल असा शब्द देतो असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले होते. त्यामुळे प्रत्यक्षात आता पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा लागून आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...