AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : अतिरिक्त उसावर आता निसर्गाचीही अवकृपा, पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मग अडसर कशाचा?

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर पर्याय म्हणून एक ना अनेक उपाय समोर आले होते. अखेर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणीची यंत्रे मराठवाड्यातील अतिरिक्त उसाच्या क्षेत्राकडे पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्यावर एकमत झाले. शिवाय ऊस तोडणीची यंत्रेही दाखल झाली आहेत. पण गेल्या दोन दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीकाठच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

Sugarcane : अतिरिक्त उसावर आता निसर्गाचीही अवकृपा, पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मग अडसर कशाचा?
साखऱ कारखाना
| Updated on: May 23, 2022 | 6:02 AM
Share

लातूर : आतापर्यंत (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाला प्रशासन आणि साखर कारखाने यांना जबाबदार ठरवले जात होते. यावर उपाययोजना म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी यंत्र आता मराठवाड्यात दाखल झालेले आहेत. असे असताना आता (Sugarcane Sludge) उसतोडणीला पावसाचा अडसर होत आहे. दोन दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यातील लातूर, परभणी, जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ही ऊसतोडणीची यंत्रे आता उसाच्या फडातही जाणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी अवस्था ऊस उत्पादकांची झाली आहे. आता ऊसतोडीचे यंत्रे असताना पावसामुळे बंद ठेवावी लागली आहेत.

प्रशासनाच्या नियोजनाला पावसाचा अडसर

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर पर्याय म्हणून एक ना अनेक उपाय समोर आले होते. अखेर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणीची यंत्रे मराठवाड्यातील अतिरिक्त उसाच्या क्षेत्राकडे पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्यावर एकमत झाले. शिवाय ऊस तोडणीची यंत्रेही दाखल झाली आहेत. पण गेल्या दोन दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीकाठच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे यंत्रे शेतामध्ये जाणेही मुश्किल झाले आहे. ऊसाच्या गाड्या फडातच अडकत आहेत तर तोडणीसाठीही अडथळा निर्माण होत आहे.

प्रशासानाचे नियोजन काय ?

अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत एक ना अनेक पर्याय समोर आले आहेत. यंदा हंगाम लांबला तरी संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय धुराडी बंद करु नये असे आदेशच साखर आयुक्त यांनी कारखाना प्रशासनाला दिले आहेत. मे अखेरपर्यंत ऊसतोड पूर्ण व्हावे या अनुशंगाने साखर आयुक्त प्रशासनाने नियोजन केले होते. पण यंदा पावसाळा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. एवढेच नाही तर पावसाला काही भागात सुरवातही झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरही पाणी फेरले असल्याचे चित्र आहे.

यंदा 7 महिने कारखान्याची धुराडी पेटलेलीच

दरवर्षी 4 महिन्यात हंगाम पूर्ण होत असतो. पण यंदा अतिरिक्त उसामुळे सर्वकाही नियोजन कोलमडले आहे. ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पन्न विक्रमी झाले असले तरी दुसरीकडे काही शेतकऱ्यांचा जीव हा टांगणीलाच लागलेला आहे. आता प्रशासनाकडून उपाययोजनेची अंमबलबजावणी करण्यास सुरवात झाली होती. पण याला निसर्गाचाच अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम पूर्ण होतो की नाही याबाबत शंका आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.