AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : नुकसानीचा आढावा घेऊन अजित पवार निघाले मुंबईला, शेतकऱ्यांचा प्रश्न निकालीच लावणार..!

राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी पंचनामेही नाहीत. प्रति हेक्टर 75 हजाराची मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी यापूर्वीच केली आहे. विदर्भानंतर त्यांनी मराठवाड्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सध्याचे राजकारण आणि ग्राऊंडवरची स्थिती यामध्ये खूप मोठा फरक आहे.

Ajit Pawar : नुकसानीचा आढावा घेऊन अजित पवार निघाले मुंबईला, शेतकऱ्यांचा प्रश्न निकालीच लावणार..!
अजित पवार, विरोधी पक्षनेतेImage Credit source: tv9
| Updated on: Jul 31, 2022 | 10:12 AM
Share

औरंगाबाद :  (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Kharif Crop) खरीप हंगामातील पिकांसह राज्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि ग्रामीण भाग पिंजून नुकसानीची पाहणी केली आहे. रविवारी ते मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करुन सोमवारी मुंबईत दाखल होत आहेत. या दरम्यानच्या काळात त्यांनी ठिकठिकाणी नुकसानीचा आढावा घेतला असून शेतकऱ्यांच्या समस्या ते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहे. राज्यातील स्थिती विदारक आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर जे संकट ओढावले आहे ते मदतीच्या माध्यमातून दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान

राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी पंचनामेही नाहीत. प्रति हेक्टर 75 हजाराची मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी यापूर्वीच केली आहे. विदर्भानंतर त्यांनी मराठवाड्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सध्याचे राजकारण आणि ग्राऊंडवरची स्थिती यामध्ये खूप मोठा फरक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि तेही भरीव अशी केली तरच शेतकऱ्यांवरील संकट दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्तबगार तरीही..

सध्या राज्याचा कारभार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच हाकत आहेत. ते कितीही कर्तबगार असले तरी आपले राज्य मोठे असल्याने शक्य नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करुन जबाबदारी पालकमंत्र्यांवर दिली तर अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. राज्यात केवळ एकच समस्या आहे असे नाही. दिवसागणिस त्याचे स्वरुप बदलत नाही. मात्र, मुंबईत बसून लक्षात येणार नाही तर स्थानिक पातळीवर फिरुन, शेतकऱ्यांशी संवाद साधूनच त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे.

महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नाही

नव्या सरकारची स्थापना होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. याची जाणीव सरकारला असणे गरजेचे आहे. आता कुठे हालचालींना वेग आला असून दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.