AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan: 9.7 कोटी शेतकऱ्यांना राखी पौर्णिमेची भेट, खात्यात इतके कोटी जमा होणार

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकार PM-Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 20 वा हप्ता जारी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतील एका कार्यक्रमात हा हप्ता जारी करणार आहेत.

PM Kisan: 9.7 कोटी शेतकऱ्यांना राखी पौर्णिमेची भेट, खात्यात इतके कोटी जमा होणार
नमो शेतकरी महासन्मान योजनेतंर्गत 1892 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
| Updated on: Jul 30, 2025 | 7:12 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आयोजित होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. यावेळी २०,५०० कोटी रुपयांचा निधी थेट ९.७ कोटी शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा केला जाणार आहे. साल २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरु करण्यात आली होती.

केव्हा जारी होणार २० वा हप्ता ?

कृषी मंत्रालयाच्यामते २०१९ मध्ये सुरु झालेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हप्त्यांद्वारे एकूण ३.६९ लाख कोटी रुपये जमा केला आहेत. योजनेची २० वा हप्त्यांची माहिती देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी एक परिपत्रक जारी करीत सांगितले की २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेत जमा केला जाणार आहे. यामुळे ९.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

येथे पाहा पोस्ट –

वाराणसीत होणार विशेष कार्यक्रम

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी पीएम किसान योजनेचा २० हप्ता वाराणसीतील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी होणार आहे.

काय आहे PM-Kisan योजना?

या पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्यात वर्षातून तीन वेळा त्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. या योजनेचा हेतू छोटे शेतकरी आणि अल्पभुधारक यांना आर्थिक मदत करणे हा आहे.

काय आहे पात्रतेचे निकष ?

PM-Kisan योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांजवळ E-KYC वाले बँक खाते हवे, हे शेतकऱ्याच्या आधारकार्ड कार्डशी लिंक असलेले हवे.या सोबत जमीन रेकॉर्ड योग्य आणि अपडेटेड असायला हवे, सरकारच्या वतीने या अटी सांगितलेल्या आहेत. कारण योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणाही गैरव्यवहार होऊ नये याची काळजी सरकार घेत असते.

शेतकऱ्यांना दिलासा

PM-Kisan योजना अल्पभूधारकांसाठी आधार आहे. ज्यांच्याकडे शेतीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही अन्य साधन नाही त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी आहे. या शेतकऱ्यांना आपल्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी कर्ज काढावे लागते. परंतू या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. त्यामुळे त्यांच्या अडनडीला हा पैसा उपयोगी ठरतो.

Follow Us
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.