AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : तयारी पूर्ण आता पावसाची प्रतिक्षा, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

कृषी विभागाचे नियोजन आणि उन्हाळी हंगामात सोयाबीनचा वाढलेला पेरा यामुळे यंदा सोयाबीन बियाणांचा तर तुटवडा भासणार नाही. असे असतानाही महाबीजने यंदा दरात वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिकचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, घरच्या बियाणांमधून अपेक्षित उतारा पडत नाही त्यामुळे शेतकरी हे विकत्या बियाणांवरच भर देत आहेत.

Kharif Season : तयारी पूर्ण आता पावसाची प्रतिक्षा, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग
Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 24, 2022 | 2:58 PM
Share

लातूर : यंदा (Rain) पावसाचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनी (Pre-Kharif) खरीपपूर्व शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. पाऊस पडल्यानंतर (Seeds) बी-बियाणांचा तुटवडा भासेल म्हणून शेतकरी आता बी-बियाणे खरेदीवर भर देत आहेत. शेतकऱ्यांनी सर्व तयारी केली असली तरी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय चाढ्यावर मूठ ठेऊ नये असे अवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातही सोयाबीनवरच शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. सोयाबीनचीच उत्पादकता वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल असून राज्यात 46 लाख हेक्टरावर पेरा होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने वर्तवला आहे.

बियाणांची चिंता मिटली, खताची धास्ती कायम

कृषी विभागाचे नियोजन आणि उन्हाळी हंगामात सोयाबीनचा वाढलेला पेरा यामुळे यंदा सोयाबीन बियाणांचा तर तुटवडा भासणार नाही. असे असतानाही महाबीजने यंदा दरात वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिकचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, घरच्या बियाणांमधून अपेक्षित उतारा पडत नाही त्यामुळे शेतकरी हे विकत्या बियाणांवरच भर देत आहेत. तर दुसरीकडे खताच्या दरात वाढ झाली नसली तरी तुटवडा भासल्यानंतर विक्रेत्ये काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

यंदा सर्वकाही वेळेवर, वाढीव उत्पादनासाठी प्रयत्न

उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी पुरेसा वेळ मिळाला होता. त्यामुळे नांगरण, मोगडणी आणि कोळपणी ही कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामे उरकण्यावर भर दिला होता. आता मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली तर वेळेत पेरण्या देखील होतील. खरिपात पेरण्या वेळेवर झाल्या तर उत्पदनात वाढ होते असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे गतवर्षी झालेली परवड आणि नुकसान हे दोन्हीही यंदा भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे राहणार आहे.

सोयाबीनवरच भर, पीक पध्दतीमध्येही बदल

यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी मराठवाड्यात सोयाबीनवरच शेतकऱ्यांचा भऱ राहणार आहे. वाढत्या दरामुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असे अंदाज वर्तवले जात होते पण मराठवाड्यातून परभणी आणि हिंगोली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये कापसाचे पीक घेतले जात नाही. त्यामुळे सोयाबीनचेच क्षेत्र वाढणार असून उत्पादनवाढीसाठी बीबीएफ, टोकण पध्दतीने पेरणी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी कृषी विभागाकडूनही जनजागृती केली जात आहे. या सर्व बाबींचे फलीत यंदाच्या खरीप हंगामात पाहवयास मिळणार आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?