AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?

राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jul 03, 2020 | 8:36 AM
Share

नागपूर : ‘कोरोना’च्या संकट काळातही बळीराजाला समाधानकारक पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात सर्वदूर पुरेसा पाऊस पडल्याने, शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. (Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

महाराष्ट्रात एकूण सरासरीच्या 112 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यातील 69 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या दोन्ही विभागात आतापर्यंत सरासरीच्या 150 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती आणि पुणे विभागातही सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला.

सुरुवातीच्या दिवसांतच पावसानं चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झाला.

सरासरी पाऊसमान तालुक्यांची संख्या

100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त – 222 तालुके

75 ते 100 टक्के पाऊस – 62 तालुके

50 ते 75 टक्के पाऊस – 50 तालुके

25 ते 50 टक्के पाऊस – 19 तालुके

फोटो : कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

राज्यातील सहा विभागापैकी कुठल्या विभागात किती पाऊस पडला?

विभाग – पावसाची टक्केवारी

कोकण – 81.7 टक्के

नाशिक – 150.3 टक्के

पुणे – 101.2 टक्के

औरंगाबाद – 151.6 टक्के

अमरावती – 124.1 टक्के

नागपूर – 96 टक्के

राज्यात एकूण सरासरीच्या 112.6 टक्के पावसाची नोंद झाली

संबंधित बातमी :

पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?