AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?

राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jul 03, 2020 | 8:36 AM
Share

नागपूर : ‘कोरोना’च्या संकट काळातही बळीराजाला समाधानकारक पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात सर्वदूर पुरेसा पाऊस पडल्याने, शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. (Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

महाराष्ट्रात एकूण सरासरीच्या 112 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यातील 69 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या दोन्ही विभागात आतापर्यंत सरासरीच्या 150 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती आणि पुणे विभागातही सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला.

सुरुवातीच्या दिवसांतच पावसानं चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झाला.

सरासरी पाऊसमान तालुक्यांची संख्या

100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त – 222 तालुके

75 ते 100 टक्के पाऊस – 62 तालुके

50 ते 75 टक्के पाऊस – 50 तालुके

25 ते 50 टक्के पाऊस – 19 तालुके

फोटो : कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

राज्यातील सहा विभागापैकी कुठल्या विभागात किती पाऊस पडला?

विभाग – पावसाची टक्केवारी

कोकण – 81.7 टक्के

नाशिक – 150.3 टक्के

पुणे – 101.2 टक्के

औरंगाबाद – 151.6 टक्के

अमरावती – 124.1 टक्के

नागपूर – 96 टक्के

राज्यात एकूण सरासरीच्या 112.6 टक्के पावसाची नोंद झाली

संबंधित बातमी :

पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष