AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी ऊसदर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार

जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानात ऊस परिषद होणार असून राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि पूरग्रस्तांच्या मदतीवरुन कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी ऊसदर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार
raju shetti
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 10:31 AM
Share

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे 20 वी ऊस परिषद होणार आहे. जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानात ऊस परिषद होणार असून राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि पूरग्रस्तांच्या मदतीवरुन कोणती भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ऊस परिषद ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी महत्वाची मानली जाते.

एफआरपी अधिक 200 रुपयांची मागणी होणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या 20 वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात होणार आहे. एफआरपी अधिक 200 ची पहिली उचल देण्याची मागणी राजू शेट्टी करण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी म्हणून आग्रही भूमिका घेतलीय. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी बाजारात साखरेचे दर वाढल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एफआरपी अधिक 200 रुपयांची मागणी होण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांचं लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलानाचं रणशिंग जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतून फुंकलं जातं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेची आतुरतेनं वाट पाहत असतात. राजू शेट्टी ऊस परिषदेत जी भूमिका मांडतील त्याआधारे स्वाभिमानीकडून आंदोलन सुरु करण्यात येतं. यंदा पहिल्यांदाच गाळप हंगामाआधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहणार असल्याचं कळतंय.

महापुराच्या मदतीवरुन राजू शेट्टी निशाणा साधणार ?

जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्यानं राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुन देखील राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता महापुराच्या तुटपुंज्या नुकसान भरपाई वरही सरकार विरोधात नव्याने एल्गार स्वाभिमानीतर्फे पुकारला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या

निवडणुकीसाठी मनसेचा ‘डिजिटल राजमार्ग’, राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghtana sugarcane rate council will held tomorrow at Jayasinghpur

Follow Us
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.