AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana : केळीला विक्रमी दर, दोन वर्ष नुकसानीचे यंदा कशामुळे बदलले दराचे चित्र?

गेल्या दोन वर्षात केळीमधून उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नव्हता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणीत घट झाल्याने उत्पादकांना कवडीमोल दरात केळी विकावी लागली तर कोरोनाबरोबर केळींच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनात घट आणि दरही कवडीमोल अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक होते. केळीला बारामाही मागणी असते पण कोरोना आणि बाजारपेठेतील चित्र यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली होती.

Banana : केळीला विक्रमी दर, दोन वर्ष नुकसानीचे यंदा कशामुळे बदलले दराचे चित्र?
केळीचे दर अचानक घसरल्याने केळी उत्पादक अडचणीत आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 25, 2022 | 11:13 AM
Share

नांदेड : एकीकडे पावसाने (Kharif Season) खरीप हंगामातील सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे चित्र आहे. कारण जिल्ह्यात उत्पादित होत असलेल्या (Banana Production) केळी यंदा प्रथमच विक्रमी दर मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी 2 हजार ते 2 हजार 100 पेक्षा अधिकचा दर मिळालेला नव्हता. मात्र, उत्तर भारतामध्ये मागणी वाढल्याने प्रति क्विंटल 2 हजार 500 रुपये असे दर मिळत आहेत. लागवडीपासून असे दर प्रथमच मिळाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे श्रावण महिन्यामध्ये दरात आणखी वाढ होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच (Banana Rate) केळीला चांगला दर मिळालेला आहे. उत्पादन घटल्याने मागणीत वाढ होत आहे. त्यामुळेच हा बदल होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

दोन वर्षातील नुकसान निघणार का भरुन?

गेल्या दोन वर्षात केळीमधून उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नव्हता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणीत घट झाल्याने उत्पादकांना कवडीमोल दरात केळी विकावी लागली तर कोरोनाबरोबर केळींच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे उत्पादनात घट आणि दरही कवडीमोल अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक होते. केळीला बारामाही मागणी असते पण कोरोना आणि बाजारपेठेतील चित्र यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली होती. अनेकांनी तर केळी बागा मोडीतही काढल्या होत्या.

उत्पादनात घट, दरात वाढ

सध्या बाजारपेठेत मागणी कायम असली तरी दरम्यानच्या काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देखील बागांना बसलेला आहे. घटत्या उत्पादनाबरोबर लागवडीचे क्षेत्रही नांदेड जिल्ह्यामध्ये कमीच झाले आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून आता मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अर्धापूरी, मुदखेड, नांदेड, हदगाव या तालुक्यामध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. वाढत्या मागणीमुळे या भागातील केळीला 2 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळत आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे दर मिळाला आहे. मागणीत वाढ कायम राहिली तर दरात आणखी वाढ होणार आहे. यातच आता श्रावण महिना सुरु होत असल्याने मागणी वाढणार आहे.

अशी झाली दरात सुधारणा

यंदा केळीचा हंगाम हा मे महिन्यापासून सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच केळीला 1 हजार 600 ते 1 हजार 700 रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. त्यामुळे दरात वाढ होणार याबाबत शेतकरी हे आशादायी होते. शिवाय व्यापाऱ्यांकडून मागणी ही वाढ होती. जूनमध्ये 1 हजार 800 ते 2 हजार असा भाव मिळाला तर जुलैमध्ये आता हाच भाव थेट 2 हजार ते 2 हजार 500 पर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या संघर्षानंतर आता कुठे केळी उत्पादकांमध्ये समाधान आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय